Thursday 31 May 2018

महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळांना केंद्र शासन चालना देणार : डॉ. महेश शर्मा




नवी दिल्ली,31 : महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळांना केंद्र शासन चालना देणार असल्याचे  केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा  आज येथे  म्हणाले.

केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. शर्मा यांनी आज महाराष्ट्र सदनातील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयाला भेट दीली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्वच पर्यटन स्थळांना केंद्र शासन चालना देणार, असल्याचे श्री शर्मा म्हणाले. यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी श्री शर्मा यांचे स्वागत केले.

यावेळी राज्यातील विविध पर्यटन विषयांवर चर्चा झाली. यामध्ये महाराष्ट्रातील किल्ल्यांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करता येईल आणि भारतीय पुरात्तत्व विभागाशी कसा समन्वय साधता येईल, यावर चर्चा झाली. यामध्ये येणा-या अडचणींना लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल, असे श्री शर्मा म्हणाले.

यासह अजिंठा-वेरूळ लेण्यांच्याजवळ इंडो-जपान केंद्र बनिवण्यात आले असून केंद्रच्या सांस्कृतिक विभागाने यासाठी निधी दिलेला आहे. याचा प्रचार-प्रसार कसा करता येईल, याविषयीही यावेळी चर्चा करण्यात आली. याशिवाय स्थानिक कलांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ही केंद्र शासन प्रयत्न करणार असल्याचे श्री शर्मा यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील पर्यटन विषयावरील निवेदन श्री रावल यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री शर्मा यांना यावेळी दिले.


No comments:

Post a Comment