Friday 30 June 2023

पद्म पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्याचे आवाहन 15 सप्टेंबर पर्यंत मुदत


नवी दिल्ली30: केंद्रसरकार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करत असते. त्यास अनुसरून यावर्षीही पद्म पुरस्कार 2024 साठी ऑनलाईन नामांकन/ शिफारशीबाबतचे आवाहन केले आहे. याबाबतची निवेदने स्वीकारण्याची सुरुवात 1 मे 2023 पासून सरकारने केली असूनपद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/ शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in ) वर ऑनलाइन स्वीकारल्या जात आहेत.

             पद्म पुरस्कार, अर्थात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये प्रारंभ झालेल्या या पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला होते. हा पुरस्कार विविध क्षेत्रातील ‘असामान्य कर्तृत्वाचा’ सन्मान करण्यासाठी दिला जातो.

कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारखी सर्व क्षेत्रे/ विषयांमध्ये विशिष्ट आणि अद्वितीय कामगिरीसाठी/ सेवेसाठी हा पूरस्कार दिला जातो. वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्ति या पुरस्कारांसाठी पात्र मानले जातात.

            पद्म पुरस्कारांचे स्वरूप ‘लोकांचे पद्म’ मध्ये रुपांतरित करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. यास्तवसर्व नागरिकांना स्वतःच्या नामांकनासह इतरांचे नामांकन/ शिफारशी पाठवण्याचे आवाहनही केले जात आहे. नामांकन /शिफारशींमध्ये उपरोक्तप्रमाणे निर्देशित केलेल्या पोर्टलवर उपलब्ध विहित नमुन्यात निर्दिष्ट केलेले सर्व संबंधित तपशील दिले असून, यामध्ये शिफारस केलेल्या व्यक्तिबद्दल संबंधित क्षेत्रातील विशिष्ट आणि उल्लेखनीय  कामगिरी/ सेवा ठळकपणे मांडणाऱ्या वर्णनात्मक स्वरूपात (जास्तीत जास्त 800 शब्द) उद्धरण समाविष्ट  केलेले असावे.

            या संदर्भातील तपशील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) ‘पुरस्कार आणि पदके’ या शीर्षकाखाली आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in ) देखील उपलब्ध आहेत.  या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकसह संकेतस्थळावर उपलब्ध असूनत्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचे आव्हान सरकारने केले आहे.

 ***********


 

Wednesday 28 June 2023

सरकारी ई-मार्केट में महाराष्ट्र का उल्लेखनीय प्रदर्शन





केंद्र सरकार के आवाहनपर राज्य सरकारे ई-मार्केट को बढ़ावा दे रही है. महाराष्ट्र राज्य ने इसमें ऊंची छलांग लगाई है. महाराष्ट्राने वर्ष 2022-23 मे गवर्नमेंट-ई-मार्केटप्लेस (जेम) प्रणाली से 4130 करोड़ की खरेदी की है, जिसके लिए राज्य को सराहा गया है और सम्मानित भी किया गया है.

केंद्र सरकार ने 2016 से गवर्नमेंट-ई-मार्केटप्लेस (जेम) प्रणाली विकसित की है, जिसके तहत सरकार को आवश्यक सेवाओं की आपूर्ति जेम के माध्यम से की जाती है। इससे राज्य सरकार, विभिन्न विभागों, महिला उद्यमियों, अनुसूचित जाति/जनजाति उद्यमियों को काफी प्रोत्साहन मिल रहा है। इसमें महाराष्ट्र अच्छा प्रदर्शन कर रहा है.

वित्तीय वर्ष 2022-23 में, राज्य सरकार ने राष्ट्रीय सार्वजनिक खरीद बाजार में व्यवसाय संचालित करने के लिए जेम पोर्टल पर लगातार भरोसा करके सार्वजनिक खरीद प्रक्रिया की विश्वसनीयता बढ़ाने की दिशा में अनुकरणीय प्रतिबद्धता दिखाई है। इसके तहत राज्य सरकार के उद्योग निदेशालय की ओर से राज्य के बड़े क्रय विभागों के लिए समयबद्ध कार्यक्रम लागु किए हैं. इसके तहत जेम पोर्टल के उपयोग को बढ़ाने के लिए पोर्टल की नई सुविधाओं और कार्यप्रणाली के संबंध में जागरूकता कार्यक्रम आयोजित किए गए।

खरीद प्रक्रिया में आने वाली कठिनाइयों को दूर करने के लिए त्वरित कदम उठाए गए। राज्य सरकार ने सूक्ष्म और लघु उद्यमियों को जेम पोर्टल पर पंजीकृत करने के लिए विभिन्न विभागों के माध्यम से जागरूकता कार्यक्रम और प्रशिक्षण सत्र आयोजित किए। अब तक सरकार ने पोर्टल पर 7508 क्रेता प्रशिक्षुओं के लिए 105 प्रशिक्षण कार्यक्रम और 5004 आपूर्तिकर्ताओं के लिए 95 प्रशिक्षण कार्यक्रम की योजना बनाई है।

राज्य सरकार द्वारा उठाए गए विभिन्न उपायों के फलस्वरूप जेम पोर्टल पर पंजीकृत आपूर्तिकर्ताओं की कुल संख्या 1073377 है जबकी पंजीकृत खरीदारों की कुल संख्या 12398 है। इसके साथ ही पोर्टल पर राज्य के कुल 10,619 सूक्ष्म एवं लघु आपूर्तिकर्ता भी पंजीकृत हैं।

इन सभी प्रयासों का नतीजा है महाराष्ट्र को हालही मे केंद्रीय वाणिज्य एवं उद्योग मंत्रालय की ओर से गवर्नमेंट-ई-मार्केटप्लेस (जेम) को बढ़ावा देने के लिए विभिन्न 5 श्रेणीयों में 'क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार 2023' से सम्मानित किया गया.


राज्य को पांच विभ‍िन्न श्रेणियों में पुरस्कार
वर्ष 2022-23 में जेम प्रणाली से 4130 करोड़ की खरीद में प्रदेश ने देश में तीसरा स्थान प्राप्त कर रजत पुरस्कार जीता है। स्टार्टअप-उद्यमियों की खरीद में राज्य दूसरे स्थान पर रहा और उसे गोल्ड अवार्ड से सम्मानित किया गया। अनुसूचित जाति/अनुसूचित जनजाति उद्यमियों की खरीद में राज्य ने अच्छा प्रदर्शन किया है और राज्य इस श्रेणी में दूसरे स्थान पर आया है और सुवर्ण अवार्ड से सम्मानित किया गया है। सूक्ष्म और लघु उद्यमों के माध्यम से खरीद में यह तीसरे स्थान पर रहा और रजत पुरस्कार से सम्मानित किया गया। महिला उद्यमियों द्वारा खरीद श्रेणी में राज्य ने तीसरा स्थान प्राप्त कर रजत पुरस्कार प्राप्त किया।

 

Tuesday 27 June 2023

शासकीय ई-बाजारात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी

 






विविध श्रेणीत राज्याला 5 क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, 27 : महाराष्ट्राने शासकीय ई-बाजार मध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत एकूण 5 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील वाणिज्य भवनमध्ये  शासकीय-ई-बाजारपेठ (Government e Marketplace (GeM)) ला प्रोत्साहन देण्यासाठी  क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार 2023 प्रदान सोहळयाचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय वाण‍िज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्य वाण‍िज्य आणि उद्योग मंत्री अनुप्रिया पटेल तसेच वर‍िष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्र शासनाने शासकीय-ई-बाजारपेठ प्रणाली 2016 पासून  विकस‍ित केली असून या अंतर्गत शासनाला लागत  असलेल्या सेवा सामुग्रीचा पुरवठा जेमच्या माध्यमातून केला जातो. राज्य शासन, विविध विभाग, महिला उद्योजक, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती च्या उद्योजकांना यामाध्यमातून मोठया प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. यासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला  5  क्रेता-विक्रता गौरव पुरस्कार प्रदान करून  गौरविण्यात आले.

विविध पाच श्रेणीत राज्याने मारली बाजी

राज्याने वर्ष 2022-23 मध्ये जेम प्रणालीवरून 4130 कोटींची खरेदी करून देशात तिसरे स्थान पटकावून सिल्वर पुरस्काराचा मानकरी ठरला.  स्टार्टअप - उद्योजकांच्या खरेदीमध्ये राज्याने दुसरे स्थान मिळविले असून गोल्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उद्योजकांच्या खरेदीमध्ये राज्याने चांगली कामगिरी केलेली असून या श्रेणीत राज्याचा  दुसरा क्रमांक आलेला असून गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  सुक्ष्म व लघु उपक्रमांमार्फतच्या खरेदीमध्ये तिसरा क्रमांकावर असून सिल्वर  पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला उद्योजकांमार्फतच्या खरेदी या श्रेणीमध्ये राज्याने तिसरा क्रमांक मिळवून सिल्वर पुरस्काराचा मानकरी ठरला. या सर्व श्रेणीतील पुरस्कार उद्योग संचालनालयाचे  विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी केंद्रीय वाणिज्य राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते  स्वीकारले. उद्योग सह संचालक (खरेदी धोरण) विजू सिरसाठ या यावेळी उपस्थित होत्या.

 राज्याच्या उद्योग संचालनालयाने शासकीय ई- बाजार प्रणालीला असे दिले प्रोत्साहन

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये राज्याने राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी बाजारात व्यवसाय करण्यासाठी सातत्याने जेम पोर्टलवर अवलंबून राहून सार्वजनिक खरेदी प्रक्रियेची विश्वासार्हता वाढविण्याच्या दिशेने अनुकरणीय वचनबद्धता दर्शविली आहे. यातंर्गत उद्योग संचनालयाच्यावतीने  राज्यात मोठया प्रमाणात खरेदी करणाऱ्या विभागांकरिता कालबद्ध बाह्यपोच कार्यक्रम (Outreach Program) राबविला. या अंतर्गत जेम पोर्टलचा वापर वाढविण्यासाठी पोर्टलचे नवनवीन फिचर्स आणि कार्यप्रणालीबाबत जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन केले.

खरेदी प्रक्रियेत उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी जलद उपाय योजले. सुक्ष्म व लघु  उद्योजकांची जेम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शासनाने विविध विभागांमार्फत जागरूकता कार्यक्रम आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित केली. आतापर्यंत शासनाने पोर्टलवर 7508 खरेदीदार प्रशिक्षणार्थीसाठी  105 प्रशिक्षण कार्यक्रम आणि 5004 पुरवठादारांसाठी 95 प्रशिक्षण कार्यक्रम आखले आहेत.

राज्य शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे जेम पोटर्लवर आतापर्यंत एकूण नोंदणीकृत 1073377 पुरवठादार आहेत तर एकूण नोंदणीकृत  12398 खरेदीदार झाले आहेत. यासह पोर्टलवर राज्यातील एकूण नोंदणीकृत 10,619 सुक्ष्म व लघु पुरवठादार देखील आहेत.

Monday 26 June 2023

राजधानीत राजर्षि शाहू महाराज जयंती साजरी

 







नवी दिल्ली, 26 :  सामाजिक समतेचे प्रणेते राजर्षि शाहू महाराज यांची जयंती उभय महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आज साजरी करण्यात आली.

 कस्तुरबा गांधीस्थित महाराष्ट्र सदनच्या दर्शनी भागात राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनच्या सभागृहात शाहू महाराजांच्या प्रतिमेस प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री तसेच माजी खासदार, श्री हुसेन दलवाई यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. सहायक निवासी आयुक्त राजेश आडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कर्मचा-यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 महाराष्ट्र परिचय केंद्रात राजर्षि शाहू महाराजांना अभिवादन

सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरूष, राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी राजर्षि शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

 ******************

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

 http://twitter.com/micnewdelhi 

 अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.110 / 26 .6.2023 

 


Friday 23 June 2023

साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर मराठी भाषेसाठी ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ यास ‘युवा’ साहित्य अकादमी तर ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर







नवी दिल्ली, 23 : साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणारे साहित्य अकादमी ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी विशाखा विश्वनाथ या युवा साहित्य‍िकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बाल साहित्यसाठी बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या युवा साहित्य आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी 3 सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे पालन करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. दोन्ही श्रेणीतील पुस्तके मागील पाच वर्षांमध्ये (1 जानेवारी 2017 पासून ते 31 डिसेंबर 2021 ) या कालावधीत प्रकाशित झालेली आहेत.

युवा साहित्य पुरस्कारांमध्ये 20 भाषेतील युवा साहित्यिकांना अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. तर, बाल साहित्य पुरस्कारांसाठी 22 भाषेतील साहित्यकांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेली आहे. युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे.

मराठी भाषेसाठी नवोदित तरूण कव‍िय‍त्री विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास साहित्य अकादामीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. विशाखा यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. 86 कविता असणाऱ्या त्यांच्या हा संग्रह प्रकाशक गमभन यांनी प्रकाशित केलेला आहे. यामध्ये कव‍ियत्रीने स्वत: सोबत भांडण करत स्वत: वर प्रेम करण्यापर्यंतचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. पुरस्कार जाहीर झाले असल्याचे कळल्यावर, ‘परीकथा खरी झाली असल्यासारखे जाणवत असल्याची प्रतिक्रीया दिली.’ कुटूंबात कोणाचाच वावर साहित्य क्षेत्रात नसल्याचे सांगुन आपल्याला जे आवडत ते लिहीण्याचा हा प्रयत्न असल्याचे विशाखा यांनी सांगि‍तले. विशाखा यांचे शिक्षण फिल्म मेकिंगमध्ये झालेले असून फिल्म मार्केटींग मध्ये त्या काम करतात. गोष्ट एका पैठणीची, अथांग, गुडबाय, पावनखिंड, झोंबिवली, चंद्रमुखी, शेर शिवराज, मी वसंतराव या सारख्या 50 नामांकित हिंदी मराठी चित्रपट आणि वेबसिरीजसाठी डिजिटल मार्केटींग आणि कॉपीरायटींग त्यांनी केलेलं आहे.

मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्य‍िक डॉ. अक्षय कुमार काळे, बाबा भांड आणि प्रो (डॉ.)विलास पाटिल यांचा समावेश होता.

सुप्रसिद्ध बाल साहत्यिकार व कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आंनद’ या मराठी बाल कव‍िता संग्रहास साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहिर झाला. लेखक मागील 30 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देतांना श्री आव्हाड म्हणाले, ‘मागील 30 वर्षांपासून बालकांसाठी लिह‍ित असलेल्या साहित्याचे या पुरस्कारामुळे चीज झाले.’

साहित्य‍िक आव्हाड हे मुलांसाठी कथा, कविता, नाटयछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन करतात. त्यांचे अक्षरांची फुले, आभाळाचा फळा, खरंच सांगतो दोस्तांनो, गंमतगाणी, तळ्यातला खेळ, पंख पाखरांचे, बोधाई, मज्जाच मज्जा, हसरे घर, सवंगडी, मजेदार गाणी, आनंद झुला, शब्दांची नवलाई असे बाल कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. मराठी भाषेसाठी तीन सदस्य निर्णयाक मंडळामध्ये कैलाश अभुंरे, उमा कुलकर्णी आणि शफ़ाअत खान या साहित्य‍िकांचा समावेश होता. 

 

Thursday 22 June 2023

महाराष्ट्राला 3 राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

 



राष्ट्रपती यांच्या हस्ते आज पुरस्काराचे वितरण


नवी दिल्ली, 22 : आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थवृत्तीने सेवा देणाऱ्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा   आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरवण्यिात आला. याप्रसंगी 2022 आणि 2023 च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात  2022 मध्ये महाराष्ट्रातील 1 आणि  वर्ष 2023 मध्ये 2   परिचारिकांचा समावेश आहे.

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री एस.पी.सिंग बघेल विभागाचे सचिव राजेश भुषण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी वर्ग, आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यक्ती उपस्थित होते.

 

यावेळी वर्ष 2022 मध्ये 15 आणि वर्ष  2023 मध्ये 15 असे एकूण 30 परिचारिका आणि परिचारक यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  वर्ष 2022 मध्ये मिळालेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, निर्मल उपकेंद्र, भुईगांव येथील सहायक परिचारिका (दाई) सुजाता पीटर तुस्कानो, वर्ष 2023 मध्ये मिळालेल्या पुरस्कारांमध्ये राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालयाच्या  सार्वजनिक आरोग्य परिचारिका पुष्पा श्रावण पोडे आणि  दक्षिण कमांड (वैद्यकीय ) मुख्यालय पुण्याच्या ब्रिगेडियर एम.एन.एस.अमिता देवरानी यांचा समावेश आहे.

 

सुजाता पीटर तुस्कानो यांचा  सहायक परिचारिका (एएनएम) म्हणून  35 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी निमवैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत अनेकांना आरोग्य सेवा प्रदान केलेली आहे.  जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील आरोग्याशी विषयक  कार्यशाळेत त्या नेहमीच सहभागी होत असत.  व्यापक समाजकार्यासाठी  यापूर्वी श्रीमती तुस्कानो यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.

 

पुष्पा श्रावण पोडे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हा रूग्णालयात सार्वजनिक आरोग्य परिचारिका म्हणून मागील 21 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्या त्यांच्या कामाप्रती अंत्यत वचनबद्ध व मेहनती परिचारिका म्हणून लोकप्रिय आहेत. श्रीमती पोडे यांनी लक्ष्यपूर्तीसाठी सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदविला आहे. श्रीमती पोडे यांनी दिलेल्या आरोग्य सेवेतील लक्षणीय योगदानाबद्दल त्यांना स्थानिक पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.

 

ब्रिगेडियर अमिता देवरानी, सध्या पुणे येथे दक्षिण कमांड (वैद्यकीय)च्या मुख्यालयात ब्रिगेडियर एम. एन. एस. म्हणून कार्यरत आहेत. ब्रिगेडियर देवरानी यांनी 37 वर्ष लष्करात परिचारिका म्हणून सेवा बजावली आहे. त्या उत्तम शिक्षक आणि प्रशासक आहेत. लष्कराच्या दक्षिण कमांड अंतर्गत येणाऱ्या भूदल, नौदल आणि हवाई दलाच्या 50 रूग्णालयांचे कामकाज त्या पहातात. कोविड-19 संकटकाळात त्यांनी केलेले काम प्रशंसनीय आहे. आरोग्य क्षेत्राशी संबधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी  विपुल लेखन केलेले आहे. काँगो रिपब्लिक या देशात संयुक्त राष्ट्राने राबविलेल्या मोहिमेत संकटग्रस्त परिस्थितीत मृतदेहांचा शोध आणि व्यवस्थापन यासाठी बजावलेल्या कामगिरीबद्दल संयुक्त राष्ट्राने त्यांचे विशेष कौतुक केलेले आहे. ब्रिगेडियर देवरानी यांना लष्करी शुश्रुषेसाठी अनेक पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रे मिळालेली आहेत.

 

वर्ष 1973 पासून राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांची सुरूवात करण्यात आलेली आहे. आतापर्यंत एकूण 614 परिचारिका आणि परिचारक यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. पदक आणि प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

Wednesday 21 June 2023

महाराष्ट्र सरकार देगी वारकरियों को बीमा संरक्षण लाखों भक्तों को राहत



नई दिल्ली 21: महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पंढरपुर की आषाढ़ी वारी में सहभागी वारकरीयों के लिए बीमा संरक्षण प्रदान करने वाली 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी बीमा छात्र योजना' को लागू करने का निर्णय लिया है। राज्य सरकार लाखों वारकरियों का सरकारी निधी व्दारा बीमा संरक्षण प्रदान करेगी। यह बीमा संरक्षण वारी यात्रा के 30 दिनों के लिए होगा।
आषाढ़ महिने में निकलने वाली इस पवित्र यात्रा में लाखों वारकरी (भक्तगण) सहभागी होते हैं । यह सरकार वारकरियों के राहत के लिए बीमा संरक्षण का कवच देगी, जिससे “वारी” (यात्रा) में आहत हुए वारकरी या दुर्भाग्यपूर्ण मृत्यु होने पर सरकार उनके निकटवर्तियों को अनुग्रह राशी प्रदान करेगी । किसी वारकरी की मृत्यु होने पर उसके परिवार को 5 लाख रुपये की अनुग्रह राशि दी जाएगी। स्थायी अपंगता या दुर्घटना के कारण अपंगता की स्थिति में एक लाख रुपये दिए जाएंगे। मासिक धर्म के दौरान आंशिक विकलांगता की स्थिति में 50,000 रुपये और बीमारी की स्थिति में चिकित्सा उपचार के लिए 35,000 रुपये निधी की सहायता प्रदान करेगी। इस संबंध में शासनादेश जारी कर दिया गया है और यह योजना राहत एवं पुनर्वास विभाग के माध्यम से क्रियान्वित की जाएगी।
महाराष्ट्र राज्य अनेक महान सतों की कर्मभूमी रही है । प्रतिवर्ष आषाढी एकादशी पर राज्य के कोने-कोने से वारकरी पालकियों और दिंडी (यात्रा) के साथ सोलापूर जिले के पंढरपूर में भगवान विठ्ठल के दर्शन को पहॅुंचते है ।
इस वारी के दौरान अपघात या अन्य दुर्घटनाएं होने की संभावना रहती है और वारकरी घायल हो जाते हैं या दुर्भाग्य से उनकी मृत्यु हो जाती है। मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री ने यह फैसला उन्हें और उनके परिवार को आर्थिक मदद दिलाने के उद्देश से लिया है ।

किसानों के लाभ हेतू विज्ञान और प्रौद्योगिकी का समर्थन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


प्रत्येक जिले में विज्ञान और नवाचार पहल केंद्र; ठाणे में विज्ञान केंद्र
राजीव गांधी विज्ञान और प्रौद्योगिकी आयोग की प्रस्तुति
नई दिल्ली, 21 – किसानों का हित और लाभ को ध्यान में रखते हुए, विज्ञान और प्रौद्योगिकी गतिविधीयों को लागू करना चाहिए। इन गतिविधियों को लागू करने हेतू महाराष्ट्र सरकार हर संभव सहयोग करने की जानकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मुंबई मे दी ।
मुंबई में सह्याद्री गेस्ट हाऊस में मंगलवार को हुई बैठक में श्री.शिंदे बोल रहे थे । इस समय राजीव गांधी विज्ञान एवं प्रौद्योगिकी आयोग के अध्यक्ष, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोड़कर ने आयोग के कामकाज और विज्ञान और प्रौद्योगिकी के माध्यम से सामाजिक-आर्थिक विकास के लिए अभिनव कार्यक्रमों पर एक प्रस्तुति दी।
केंद्र सरकार के विज्ञान एवं प्रौद्योगिकी विभाग तथा एमटीडीसी की ओर से लोनार सरोवर (जिला बुलढाणा) में चल रही परियोजना को गति देने के लिए प्रत्येक जिले में विज्ञान एवं नवाचार केंद्र शुरू करने तथा ठाणे जिले में विज्ञान केंद्र शुरू करने जैसे निर्णय लिए गए।
मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभाग के अपर मुख्य सचिव डॉ. नितिन कारीर, उच्च एवं तकनीकी शिक्षा विभाग के प्रमुख सचिव विकास चंद्र रस्तोगी, प्रमुख सचिव पराग जैन-नैनुटिया, उद्योग विभाग के विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाहा, आयोग के सदस्य सचिव डॉ. एन. जी. शाह मौजूद थे।
मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि हमारे जंगलों और आसपास बड़ी मात्रा में जड़ी-बूटियां उपलब्ध हैं। किसान भी इनसे वाकिफ हैं। इन सभी प्राकृतिक संसाधनों में मूल्य जोड़कर किसानों को इसका लाभ उठाना चाहिए। किसानों व्दारा उत्पादित पदार्थ लंबे समय संवार्धित रहने हेतू, हमें विज्ञान और नवीनतम प्रौद्योगिकी का सहारा लेना होगा । इमे समृध्दी राजमार्ग के साथ सटे 18 नोड्स याने की नए शहरो का विकास होगा।”
आयोग की बायोमेडिकल डिवाइस निर्माण गतिविधियों और विभिन्न परियोजनाओं, बायोमेडिकल पार्क, महाराष्ट्र जीन फंड, इंजीनियरिंग छात्रों के लिए एमएसएमई इंटर्नशिप को विभिन्न योजनाओं और नीतियों के साथ एकीकृत करने का भीनिर्णय लिया गया।
आयोग द्वारा राज्य में कोल्हापुरी गुड़, हल्दी और बांस के महत्वपूर्ण उत्पादों को लेकर चलाए जा रहे कार्यक्रम पर चर्चा की गई।
आयोग की प्रगती
विज्ञान और प्रौद्योगिकी वित्त पोषित परियोजना के अनुदान के लिए प्रकल्प – 137, पूर्ण परियोजनाएं – 91, विभागवार संख्या इस प्रकार है: शिक्षा-15, सूचना संग्रह-8, अभियांत्रिकी-25, कृषि, पशुपालन एवं खाद्य प्रसंस्करण-38, औषधि निर्माण उद्योग-12, मत्स्य उद्योग-20, जल संसाधन-10, ग्रामीण विस्तार- 9.

‘कडेगाँव’ छोटे से गाँव में हुआ बड़ा बदलाव


कडेगाँव’ छोटे से गाँव में हुआ बड़ा बदलाव

 

केंद्र सरकार की योजनो का ठिक से कर्यान्वय किया जाय तो बेहद सकारात्मक परिणाम सामने आ सकते है. इसका जीता जागता उदाहरण कडेगाँव है. जिसने पाणी की कमी को दूर कर गाँववालों को की जिंदगीयों में बदलाव लाया. उनके इस कार्य का सम्मान हाँलही में राजधानी दिल्ली में किया गया. उत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार की श्रेणी में जालना जिले के इस कडेगाँव ग्राम पंचायत को तिसरे पुरस्कार से उपराष्ट्रपती जगदीश धनखड की उपस्थिती में  केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र शेखावत जी के हाथों सम्मानित किया गया.

 

कडेगाँव यह पास के खरपुडी में स्थित कृषि विज्ञान केंद्र के अंतर्गत आता है। कडेगाँव को 2015-16 में नेशनल इनोवेटिव क्लाइमेट रेजिलिएंट एग्रीकल्चर प्रोग्राम (एनआईसीआरए) के तहत गोद लिया गया था। भारतीय कृषि अनुसंधान परिषद के मार्गदर्शन में इस गांव में विभिन्न जलवायु अनुकूल गतिविधियों को लागू किया गया है। जादा से जादा पाणी संचयन कैसे किया जा सकता है इसपर जोर दिया गया.

 इनमें प्राकृतिक संसाधन प्रबंधन घटक के तहत गाँव में सीमेंट की नालियों का निर्माण किया गया. बांधों से किचड़ हटाकर उसे साफ किया गया.  परकोलेशन तालाबों को साफ कर वहा का किचड़ हटाया गया. भूमिगत प्लास्टिक बांधों का निर्माण कर पाणी संचयन किया गया.  कृत्रिम कुंओं का पुनर्भरण किया गया.  खेतों के झीलों से किचड़ निकाला गया. बालु की थैलियों को दबाकर चेकडॅम बनायें गये.  भुमिगत प्लास्टिक बांधों का निर्माण किया गया.  ऐसे अनेकानेक उपक्रम हाथ मे लियें गये. जिससे कडेगाँव   का पुरा रूप ही बदल गया.

इतना कर के ही गाँववासी रूके नही तो कृषी से डबल इन्कम कैसे मिल सकती है. इसका उपाय भी ढुंढ निकाला. कम सिंचाईवाली  की फसलों को प्रोत्साहित किया गया.  इसके तहत  गेहूं के स्थान पर शहतूत (रेशम उद्योग), ज्वार, चना जैसी फसले ली गई. कपास, मूंगफली,  सोयाबीन और अरहर की अंतर-फसल पद्धतियों को प्रोत्साहित किया गया।  ब्रॉड बेड और फरो (बीबीएफ) का इस्तेमाल कर सोयाबीन और चने की फसल के लिए किया जाता था। कपास की फसल में ड्रिप सिंचाई का प्रयोग किया जाता था। वाटरशेड क्षेत्र आधारित गतिविधियों - नए खेतोंकृषि के मशीनीकरण के अलावा विभिन्न गतिविधियों के माध्यम से किसानों को प्रशिक्षण देकर उनकी क्षमता में वृद्धि की गई। इन सभी उपचारात्मक योजनाओं के कारण गाँव में पानी की कमी पूरी तरह से दूर हो गई। इन सभी बदलावों के चलते गाँव ने पाणी कमी पर पुरी तरह मात कि गई है.  कडेगाँव के कियें गयें इन प्रयासों के चलते इस छोटे से ने गाँव राष्ट्रीय पटलपर पुरस्कार  हासील कर अपनी अलग से पहचान बनाई है. 

 


 

योग साधना जन आंदोलन होना चाहिए - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे




नई दिल्ली 21: आज कि बदलती जीवन शैली मे तनाव है। इस तनाव पर नियंत्रण  पाने के लिए योग साधना की आवश्यकता है । इस योग साधना  को अपनाकर, इसे जन आंदोलन बनाने की अपील  महाराष्ट्र के मुख्यमंत्रीने आंतरराष्ट्रीय योग दिन के आयोजन पर अपील की ।

           मुंबई में आयोजित इस शिबीर के आयोजन पर श्री. शिंदे ने अपनी बात रखी। इस आयोजन समारोह को  वाणिज्य और उद्योग मंत्रालय, उपभोक्ता संरक्षण मंत्रालय, खाद्य और सार्वजनिक वितरण मंत्रालय, कपड़ा मंत्रालय, मुंबई पोर्ट अथॉरिटी पतंजलि योग समिति मुंबई, भारत फूड कॉर्पोरेशन ईसीजीसी लिमिटेड, सिप्ज़-सेज़ मुंबई, सीआईसीएफ, गेटवे ऑफ़ इंडिया द्वारा अंतर्राष्ट्रीय योग दिवस का आयोजन किया गया। श्री. शिंदे ने इस आयोजन समारोह के दौरान जानकारी दी । इस अवसर पर, केंद्रीय वाणिज्य एवं उद्योग मंत्री पियूष गोयल, मुंबई पोर्ट ट्रस्ट के राजीव जलोटा, टाटा मेमोरियल के डॉ. अमित गुप्ता पतंजलि समूह के अध्यक्ष सुरेश यादव, धर्मवीर शास्त्री सहित विभिन्न विद्यालयों के छात्र-छात्राएं उपस्थित थे।

             मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि वसुधैव कुटुम्बकम योग दिवस की अवधारणा है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परिवार के सदस्य की तरह देश की देखभाल कर रहे हैं। योग दिवस को  आज 9 साल पूरे हो गए हैं. संयुक्त राष्ट्र में योग दिवस मनाने के प्रस्ताव को 200 से अधिक देशों ने स्वीकार किया है। हमारे देश ने पूरे विश्व को स्वास्थ्य की कुंजी दी है। इस अवसर पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अपील की, योग करें और स्वस्थ रहें, योग करें और निरोगी रहें" ।

             पीयूष गोयल ने कहा कि अंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर प्रधानमंत्री अंतरराष्ट्रीय स्तर पर संयुक्त राष्ट्र के कार्यक्रम में भाग लेकर हमारे देश का नाम दुनिया में ले जाने का काम कर रहे हैं. उन्होंने अपने उदाहरण से योग के लाभ और महत्व को समझाया। कोविड काल में बोलना मुश्किल था। उस समय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मुझे प्राणायाम करने की सलाह दी थी और आज मैं ठीक से बोल सकता हूं ।

             इस मौके पर फिटनेस गुरु सुरेश यादव के मार्गदर्शन में योग किया गया।

000000000


 

Tuesday 20 June 2023

मलकापुर 24*7 नल से जल देनेवाली नगर पालिका

 


हर घर जल की तहत महाराष्ट्र के  सातारा जिले मे कराड तहसील के मलकापुर  नगर पालिका  प‍िछले 15 वर्षो से निंरतर नल से जल देकर समुचे देश मे नई मिसाल कायम कि है. उनके इस प्रयास को हालही मे राष्ट्रीय स्तर पर सराहा गया है.

मलकापुर नगर परिषद ने वर्ष 2009 से 24X7 नल जलापूर्ति योजना लागू की थी। यह योजना 15 साल से लगातार चल रही है। इससे मलकापुर शहर के नागरिकों को साफ पानी की आपूर्ति की जाती है।

यह योजना देश भर के अन्य स्थानीय निकायों के लिए एक पायलट परियोजना बन गई है। मीटर के जरिए 24 घंटे पानी दिया जाता है। इसमें 90 प्रतिशत जनता जलापूर्ति कर का भुगतान समयपर करती है.  प्रत्येक माह की 15 तारीख को जल आपूर्ति कर का भुगतान करनेवाले स्थानीय नागरिकों को 10 प्रतिशत की छूट भी रखी गई है।

24X7 नल जल आपूर्ति योजना के लिए जैकवेल के माध्यम से कोयना नदी के तल से  रॉ-वॉटर लिया जाता है और फिर इसपर 24X7 फिल्टर प्लांट के माध्यम से आधुनिक तकनीक की सहायता से प्रक्रिया  की जाती है। डीआई और एचडीपीई बंद पाइपों के माध्यम से एएमआर मीटर का उपयोग कर पूरे शहर में पानी की आपूर्ति की जाती है।

 


मलकापुर नगर परिषद ने 24X7 नल जलापूर्ति योजना के साथ मलकापुर नगर परिषद ने सीवेज प्रक्रिया योजना लागू की है। इसके तहत बहुत ही योजनाबद्ध तरीके से पानी का पुन: उपयोग किया जा रहा है। इस रिसाइकिल पानी का उपयोग कृषि में हो रहा है और फसले लहलहा रही है । मलकापुर नगर परिषद के समग्र प्रदर्शन को आज राजधानी दिल्ली में सम्मानित किया गया।


केंद्रीय जल शक्ती मंत्रालयव्दारा 4 थे जल राष्ट्रीय पुरस्कारों का वितरण किया गया. तब इस मलकापुर नगरपालिका को सर्वश्रेष्ठ शहरी नागरी निकायो की श्रेणी मे  तृतीय श्रेणी का पुरस्कार उपराष्ट्रपती जगदीप धनखड की उपस्थिती में केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र शेखावत जी के हाथों प्रदान क‍िया गया. यह  पुरस्कार नगराध्यक्ष निलम येडगे और  उपनगराध्यक्ष, मनोहर शिंदे जी ने  स्वीकारा.  यह पुरस्कार सुरत जैसे बड़े महानगर  के नगर निकायों के साथ संयुक्त रूप से दिया गया. यह विशेष है. इसके पुर्व वर्ष 2011 मे जब मलकापुर ग्राम पंचायत थी तब इस  24X7 नल जलापूर्ति योजना को राष्ट्रीय शहरी जल पुरस्कार और प्रधानमंत्री पुरस्कार से भी सम्मानित किया जा चुका है।

महाराष्ट्र राज्य से ऊर्जा की बचत के लिए स्थानीय स्वराज्य संस्थाओं का पहला पुरस्कार, स्वच्छ सर्वेक्षण में 7वां  स्थान और माझी वसुंधरा 2.0 अभियान में प्रदेश में तीसरा स्थान इस नगरपालिका ने हासील किया है। साथ ही नगर पालिका  ने जनभागीदारी के माध्यम से शहर के नागरिकों के लिए विभिन्न अभिनव योजनाएं शुरू की हैं और उन्हें सफलतापूर्वक लागू किया गया है।

अंजु निमसरकर