Monday 29 February 2016

देशासह महाराष्ट्रातील रस्ते व बंदरे विकासाला गती येणार : नितीन गडकरी




नवी दिल्ली, २९: देशासह महाराष्ट्रातील रस्ते व बंदरे विकासाला गती येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते विकास व जहाजराणी मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्रातील राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होण्याच्या कामाला गती येणार. तसेच, डहाणू बंदराच्या विकास आणि राज्य परिवहन महामंडळाची स्थिती सुधारण्याच्या कामातही प्रगती होईल.

            संसदेत आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय सर्वसाधारण अर्थसंकल्पात रस्ते व बंदरे विकासासाठी करण्यात आलेल्या भरघोस तरतुदींच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी परिवहन मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाचे सचिव संजय मित्रा आणि जहाजराणी विभागाचे सचिव राजीव कुमार यावेळी उपस्थित होते.

            गडकरी म्हणाले, लोकसभेत आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी वर्ष २०१६-१७ साठी सादर केलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात कृषी, ग्रामीण विकास, रस्ते व बंदरे विकासासाठी भरघोस तरतूदी केल्या आहेत. रस्ते वाहतूक व जहाजराणी मंत्रालयासाठी १ लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून आजपर्यंत संसदेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील ही ऐतिहासिक तरतूद असल्याचे ते म्हणाले. यामुळे मोठया प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग निर्मिती, पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत  देशातील ग्रामीण भागात रस्त्यांचे मोठे जाळे तयार करण्यास , बंदरे व नद्यांद्वारे होणारी वाहतूक सुधारण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

              महाराष्ट्रासह देशातील  राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. महाराष्ट्रातील 3 हजार 839 किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास याआधिच केंद्रीय परीवहन मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिली आहे. या निर्णयाच्या अमंलबजावणीमुळे राज्यातील आदिवासी भाग व धार्मिक पर्यटन स्थळांच्या विकासास चालना मिळेल. मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील राज्य महामार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार आहे.  

            गडकरी म्हणाले की, रस्ते वाहतूक मंत्रालयाच्यावतीने जाहीर केलेल्या देशातील ५० हजार किलो मिटर राष्ट्रीय महामार्गास आजच्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. देशातील नद्यांमधून आणि बंदरातून होणारी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी १६०० कोटींची तरतूद असून महाराष्ट्रातील डहाणू बंदराचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रालयाच्यावतीने आखण्यात आलेल्या सागरमाला प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमधे बंदरे व नद्यांद्वारे होणा-या वाहतूकव्यवस्थेचा विकास करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. रायगड जिल्हयातील मांडवा किनारपट्टीवर पाणी अडविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास  केंद्राने याआधिच तत्वत: मंजुरी दिली आहे. यामुळे रायगड ते मुंबई प्रवासासाठी सागरी मार्गाचा पर्याय खुला झाला असून या मार्गाद्वारे  सर्वसामांन्याना जलद व किफायतशीर प्रवास करता येणार आहे. राज्यातील बंदरांलगतच्या गावांमधे स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विकास करणे आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची राज्याची योजना आहे.

 देशातील विविध राज्य परिवहन मंडळांची स्थिती सुधारण्यासाठी आपले  मंत्रालय पुढाकार घेणार असून त्यासाठी संबंधित राज्य सरकारांची मदत घेणार असल्याचे ते म्हणाले. राज्य परिवहन मंडळांच्या बसेस ने प्रवास करणा-यांची संख्या ७ कोटी असून ही संख्या १५ कोटींवर नेण्याचे आपल्या मंत्रालयाचे लक्ष असल्याचे ते म्हणाले. यासाठी उत्तम तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहकांना स्वस्तदरात सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. 
        पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यास सरकारची प्राथमिकता आहे. या योजनेच्या पुनरआखणीची जबाबदारीही आपणाकडे देण्यात आली होती. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते निर्माण करण्यात येतील. पर्यायाने मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती  होणार आहे. येत्याकाळात रस्ते वाहतूक मंत्रालयाच्यावतीने देशात मोठया प्रमाणात कामे करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आखण्यात आलेली मेक इन इंडियास्किल इंडिया ची संकल्पना साकारण्यास मदत होणार असून  मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.   
                                            0000000

Saturday 27 February 2016

भाषा लवचीक असावी


नवी दिल्ली, २7 : भाषा ही लवचीक असावी. त्यामुळे भाषेला अधिकाधिक समृद्ध करता येते. असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल यांनी केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित मराठी भाषा दिनच्या कार्यक्रमात श्री बागुल बोलत होते. वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसूमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन मराठी भाषा दिन साजरा करते. यावेळी उपस्थितांनी कुसूमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
     या प्रसंगी पुणे माहिती विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, मंचावर उपस्थित होते. यासह माहिती व जनसंपर्क विभागाच्या जळगाव कार्यालयाचे माहिती अधिकारी मिलिंद दुसाने, नांदेडचे माहिती अधिकारी निशिकांत तोडकर, परभणीचे माहिती अधिकारी  केशव करंदिकर तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
श्री बागुल म्हणाले, भाषेत रोजच्या रोज सहज बोलता येणा-या शब्दांचे संग्रह झाले पाहिजे. त्यामुळे भाषाची शब्द संपदा वाढून ते शब्द समाजात रूढ होतात. यावरून भाषेची  सामाजिक, सांस्कृति प्रगतीही लक्षात येते. आज जगातील प्रमुख 12 भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. मराठी भाषा समृद्ध करण्याकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील लोकांनी महत्वाची भुमिका निभावली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोगाने संगणक, मोबाईलवर मराठी लिहीणे अधिक सोपे झाले आहे. कोणतीही भाषा ही अंतस्थ उबेने जगते, ही ऊब आपल्यात सातत्याने तेवत ठेवावी असा आग्रही श्री बागुल यांनी यावेळी केला.
सर्वहारा समाजातील वाचक वर्ग वाढत आहे. वर्तमानात कुठल्याही साहित्य संमेलनात, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमात वाढती पुस्तकांची दालने बघता मराठी भाषेला कधी नव्हते इतके चांगले दिवस आता आहेत, असे पुणे विभागातील उपसंचालक यशवंत भंडारे म्हणाले. शासनही मराठी भाषा वाढविण्याकरिता विविध प्रयत्न करीत असल्याचे श्री भंडारे यांनी सांगितले. उपसंचालक श्री कांबळे यांनीही यावेळी मराठी भाषेसंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचलन तसेच आभार माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी केले. 

Friday 26 February 2016

प्रभावी जनसंपर्कातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचता येते : सुभाष देसाई - राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळेचा समारोप



नवी दिल्ली, २६ : आधुनिक माध्यमांच्या बदलत्या काळात शासनाच्या योजनांची माहिती प्रभावी जनसंपर्काच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवता येते असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने हॉटेल रॉयल प्लाझा येथे दिनांक २३ ते २६ फेब्रुवारी २०१६ दरम्यान ‘शासनातील जनसंपर्क’ विषयावर आयोजित राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे मंचावर उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, जनतेसाठी शासन उत्तमोत्तम योजना तयार करते. त्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने केले जाते. पण दिवसेंदिवस प्रसार माध्यमांचा होत असलेला विस्तार बघता जनतेपर्यंत पोहचण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व पध्दती विकसीत करून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असते. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाअंतर्गत कार्य करणा-या महाराष्ट्र परिचय केंद्राने या दिशेने सकारात्मक पाऊल उचलत देशाच्या राजधानीत राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळेचे आयोजन करून नवीन सुरुवात केली आहे.
कार्यशाळेत सहभागी विविध राज्यांतून व महाराष्ट्रातून आलेल्या अधिका-यांना याचा फायदा होणार असून अशा कार्यशाळांमुळे विचारांची आदान- प्रदान होऊन कार्यशैली विकसित करण्यास मदत होते असेही ते म्हणाले. जनतेसाठी एखादी योजना तयार करताना तिच्या प्रसिध्दीसाठी निधींचे नियोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाने मुंबईत नुकत्याच आयोजित केलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाच्या यशस्वीतेबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.
उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले , या कार्यशाळेत सहभागी प्रत्येक अधिकारी हा त्या-त्या राज्यांचा इमेज बिल्डींग करणारा दूत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून माहिती व जनसंपर्क विभागात कार्यकरणा-या देशभरातील अधिका-यांना जोडण्याचे काम झाले आहे. शासनाच्या प्रभावी जनसंपर्कासाठी या कार्यशाळेचा उपयोग होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ अधिका-यांस विविध राज्यांच्या अधिका-यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अर्चना मिरजकर यांनी केले तर महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांनी आभार प्रदर्शन केले.
राष्ट्रीय कार्यशाळेत महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ अधिका-यांसह राजस्थान, झारखंड, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाना,कर्नाटक, तामीळनाडू, आसाम, सिक्कीम, मणिपूर, दिल्ली, नागालँड, अंदमान व निकोबार या राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतून माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांनी सहभाग घेतला होता.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात ‘सामाजिक माध्यमे आणि जनसंपर्क’ या विषयावर नॅशनल मिडीया सेंटरचे संचालक बी. नारायण यांनी तर ‘ब्लॉगींग एण्ड पर्सनल ब्रँण्डींग’ या विषयावर सुनिता बिध्दू यांनी मार्गदर्शन केले. तर दुपारच्या सत्रात ‘ कटेंट ड्रिस्टीब्युशन इन टुडेच मोबाईल वर्ड’ या विषयावर रजनील यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘पीआर एण्ड इमेज बिल्डींग’ या विषयावर दिलीप चेरियन यांनी मार्गदर्शन केले, प्रतिक शाह यांनी ‘डिजीटल ब्रँडींग’ विषयावर मार्गदर्शन केले. तर दुपारच्या सत्रात आरती जैन यांनी ‘युज ऑफ ऑडीओ व्हिज्युअल मिडीया’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या तिस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात दिल्ली मेट्रोचे कार्यकारी संचालक अनुज दयाल यांनी ‘ब्रँडींग ऑफ दिल्ली मेट्रो’ विषयावर मार्गदर्शन केले, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक अजय अंबेकर यांनी ‘फ्रेमवर्क फॉर इफेक्टीव ॲण्ड इफिसियंट मिडीया’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात राजेश अग्रवाल यांनी ‘मोटीवेशनल टॉक’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या समारोप दिनी सहभागी अधिका-यांनी ‘माय बेस्ट पीआर प्रॅक्टीस’ या विषयावर सादरीकरण केले.
या कार्यशाळेच्या विविध सत्रांचे लाईव्ह वेबकास्ट उपलब्ध करून देण्यात आले असून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या www.mahanews.gov.in या संकेतस्थळावर रेकॉर्डेड वेबकास्टची लिंक देण्यात आली आहे.
0000000

विविध राज्यांच्या माहिती अधिका-यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट


नवी दिल्ली, २६ : विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांसह महाराष्ट्रशासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांनी शुक्रवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची माहिती जाणून घेतली.   
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने हॉटेल रॉयल प्लाझा येथे शासनातील जनसंपर्क विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ अधिका-यांसह राजस्थान, झारखंड, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाना,कर्नाटक, तामीळनाडू, आसाम, सिक्कीम, मणिपूर, दिल्ली, नागालँड, अंदमान व निकोबार या राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतून माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.     
       यावेळी औपचारिक वार्तालापही झाला.महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती उपसंचालक श्री. कांबळे यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय व महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम आदींची माहितीही श्री. कांबळे यांनी दिली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना या अधिका-यांनी भेट देऊन पाहणी  व चौकशी  केली.                                   

Tuesday 23 February 2016

‘न्यु मीडीया’ प्रभावी जनसंपर्क के लिऐ सुनहरा अवसर : चंद्रशेखर ओक


नई दिल्ली, 23 : प्रचार-प्रसार माध्यमों का तेजी से विस्तार हो रहा है. सरकार का काम प्रभावी रूप सें जनता तक पहुचाने कें लिए न्यु मीडीयाका उपयोग जनसपंर्क के लिए सुनहरा अवसर है, ऐसा प्रतिपादन सूचना व जनसंपर्क महानिदेशालय के महानिदेशक चंद्रशेखर ओक आज किया.
            महाराष्ट्र सूचना केंद्र की ओर से हॉटेल रॉयल प्लाजा में आयोजित सरकार में जनसंपर्कइस विषयपर राष्ट्रीय कार्यशाला के उदघाटन समारोह में श्री ओक बोल रहे थे. श्री. ओक ने  कार्यशाला का उदघाटन किया. सूचना निदेशक शिवाजी मानकर, महाराष्ट्र सूचना केंद्र के उपनिदेशक दयानंद कांबले मंच पर उपस्थित  थे. इस कार्यशाला का वेबकास्ट के माध्यम से सीधा प्रसारण किया गया.
            श्री ओक ने आगे कहा, 90 के दशक में प्रिंट मीडीया का प्रयोग बड़े पैमाने पर  मे किया जाता था. इसके बाद के दशक में इलेक्ट्रॅानीक मीडीया ने अपनी जगह बनाई. आज सोशल मीडीयाव्दारा जनता तक पहुचना अधिक आसान हो गया. सरकारी जनसंपर्क में सोशल मीडीया  के साथ न्यु मीडीया का प्रभावी उपयोग किया जायें ऐसी अपेक्षा व्यक्त कर, राज्य का सूचना व जनसंपर्क विभाग इस दिशा में कार्य कर रहा है, ऐसी उन्होंने कहा. सुचना व जनसंपर्क विभाग आधुनिक साधनों से सज्ज हो रहा है, यह जानकारी भी श्री ओक इस समय दि.
            महाराष्ट्र सूचना केंद्र की ओर से पिछले वर्ष से देश की राजधानी में राष्ट्रीय कार्यशाला का आयोजन किया जा रहा है. महाराष्ट्र देश का पहला ऐसा राज्य है, जो इस तरह हा आयोजन कर रहा है. इस कार्यशाला के माध्यम सें सूचना एंव जनसंर्पक विभाग के अधिकारीयों को लाभ होंगा ऐसी, आशा व्यक्त कर कार्यशाला को शुभ कामना दि.
            श्री कांबळे ने अपने प्रस्तावना में राष्ट्रीय स्तर पर आयोजित इस कार्यशाला का महत्व बताया. समयानुसार बदलते मीडीया का उपयोग सरकार से संबधीत  जनसंपर्क होने के लिए इन चार दिवसीय राष्ट्रीय कार्यशाला का  उपयोग होगा, ऐसा विश्वास जताया.

महाराष्ट्र सूचना विभाग का महाराष्ट्र सूचना केंद्र पहला आयएसओ कार्यालय
महाराष्ट्र सूचना केंद्र, नई दिल्ली यह आय.एस.ओ. प्रमाण पत्र प्राप्त महाराष्ट्र सूचना विभाग का पहला कार्यालय हुआ. सूचना महानिदेशक श्री चंद्रशेखर ओक के हाथों सूचना केंद्र के उपनिदेशक श्री कांबले को आय.एस.ओ. प्रमाण पत्र प्रदान किया गया. हाल ही में कार्यालय आय.एस.ओ. 9001:2008 प्रमाणित हुआ.
पहली बार वेबकास्ट के माध्यम से सीधा प्रसारण
आज के उदघाटन सामारोह का सीधा प्रसारण महाराष्ट्र सूचना विभाग की वेब साईट www.mahanews.gov.in इस पर तथा एण्ड्राइड मोबाईल पर http://cdn.app1.ivb7.com/HybridPlayer/PlayerSettings.cshtml?playerid=f23076
http://cdn.app1.ivb7.com/HybridPlayer/PlayerSettings.cshtml?playerid=f23072 इस लींक व्दारा किया गया. इस तरह कार्यक्रम का सीधा प्रसारण करनेवाला महाराष्ट्र सूचना केंद्र यह पहला कार्यालय हुआ. कार्यशाला के अन्य सत्रों का भी लाईव्ह वेबकास्ट किया जायेंगा.
            महाराष्ट्र  के सूचना तथा जनसंपर्क विभाग के वरिष्ठ अधिकारीयों के साथ  राजस्थान, झारखंड, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू एवं कश्मीर, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, तमीलनाडू, सिक्कीम, मणिपूर, नागालँड,  दिल्ली, अंदमान निकोबारसहीत राज्य तथा केंद्र शासीत प्रदेशों के सूचना व जनसंपर्क विभाग के कूल 36 अधिकारी इस कार्यशाला में सहभागी हूयें.

 उद्घाटन के बाद पहला सत्र नॅशनल मिडीया सेंटर के निदेशक बी. नारायण ने  सोशल मिडीया एंव जनसंपर्क इस विषय पर लिया. दूसरा सत्र श्रीमती सुनिता बिध्दू ने ब्लॉगींग एण्ड पर्सनल ब्रँण्डींग इस  विषय पर मार्गदर्शन किया. दोपहर के बाद का सत्र रजनील ने  कटेंट ड्रिस्टीब्युशन इन टुडेच मोबाईल वर्ड इस विषय पर लिया. यह कार्यशाला 26 फरवरी तक चलेंगी.

New Media is Playing Effective Role Encouraging PR - National PR Workshop Starts Today



 NEW DELHI,23:  New Media is playing an effective role in  Promoting and enhancing Public Relation, stated by Director General of Information and Public Relations (DGIPR), Government of Maharashtra, Shri Chandrashekhar Oak.

                The National Public Relation Workshop starts today in the capital                     organized  by the Maharashtra Information Centre (MIC) . Public Relation Officers from various States and Union Territory attended the workshop. Director General Chandrashekhar Oak, Director Shivaji Mankar and Deputy Director  of  MIC Dayanand Kamble were present on the dias. 

          Maharashtra Information Centre every year organizes National workshop on Public Relation . This year the workshop on ‘Public Relation in Government’  held at Hotel Royal Plaza in the Capital. Introductory Remark  was given by Deputy Director Dayanand Kamble and Inaugural Speech was delivered by Director General Chandrashekhar Oak.



    Speaking on the occasion Mr. Oak highlighted the important role of P.R, how it has been changed drastically.Now a days social media is very active and there is a rapid Transformation of Traditional Media. He  congratulated the Deputy Director Mr. Kamble for organizing the National level workshop on Public Relation in Government.

In the Inaugural Function Mr. Kamble expressed happiness that the PR issues in Government are getting due attention. He made an important suggestion about Public Relation tactics. He  thanked all the Delegates from various states for participating in the workshop. He discussed enchancing new technology for Public Relation.


      
     Maharashtra Information Centre first ISO Certified office.

Maharashtra Information Centre New Delhi became first ISO certified office of DGIPR. Mr.Oak  handedover the certificate to Mr. Kamble on the event.


      The first time through live webcast
The workshop was made available through  live webcast. Viewers can also see the recorded workshop sessions through the link given below.Today's workshop sessions was on air  through MIC website and viewers was able to watch on their smart phones through the website www.mahanews.gov.in  and link http://cdn.app1.ivb7.com/hybridPlayer/PlayerSettings.cshtml?playerid=74997499.


       Senior officers from Maharashtra including State Information and Public Relations Department, from Rajasthan, Jharkhand, Uttarakhand, Punjab, Uttar Pradesh, Himachal Pradesh, Jammu and Kashmir, Goa, Gujarat, Madhya Pradesh, Telangana, Karnataka, Tamil Nadu, Sikkim, Manipur, Delhi, Nagaland, Andaman and Nicobar Islands, Information and Public relations Department of the  States of the union and state officers have been participated in this workshop. The four day workshop will have various technical Session. The first Session was on “Social Media & PR” BY Shri. B. Narayanan Director of National Media Centre. “Blogging & Personal Branding” done by Smt. Samita Biddu. The afternoon Session was focused on "Content Distribution in Today’s Mobile World” by Shri Rajneel. The anchoring of the event was done by Archana Mirajakar .
Maharashtra Information Centre will be updating about the sessions held at the workshop by official social media.
                                              ***************
Note : Photo has been attached here with.



नवी माध्यमे ही प्रभावी जनसंपर्कासाठी संधी : चंद्रशेखर ओक



नवी दिल्ली, 23 : दिवसेंदिवस प्रसार माध्यमांचा विस्तार होत आहे. या माध्यमांच्या स्पर्धेत शासनाचे काम प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व्या माध्यमांकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे,असे प्रतिपादन माहिती जनसंपर्क महासंचानालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी केले.
        महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने हॉटेल रॉयल प्लाजा येथे आयोजित शासनातील जनसंपर्क विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रंसगी ते बोलत होते. श्री. ओक यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले. संचालक शिवाजी मानकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
 श्री ओक म्हणाले, देशात ९० च्या दशकापर्यंत मुद्रीत माध्यमांचा प्रभाव होता, नंतर दूरचित्रवाणीचा प्रवेश होऊन देशात वृत्तवाहिन्या आल्या. आता सामाजिक माध्यामांद्वारे सामान्य जनतेपर्यंत पोहचणे सोपे झाले आहे. शासकीय जनसंपर्कातही आता सामाजिक माध्यमांसह अन्य व्या माध्यमांचा प्रभावीपणे उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने यादिशेने सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क विभाग आधुनिक तंत्रज्ञानाने  सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.  
        महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने मागील र्षापासून देशाच्या राजधानीत राष्ट्रीय कार्यशाळेच्या आयोजनास सुरुवात झाली असून देशात असा उपक्रम सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य  ठरले आहे. यावर्षीही या कार्यशाळेच्या माध्यमातून देशातील राज्यातील अधिकारी वर्गाला याचा उपयोग होणार असून विचारांच्या देवाण-घेवानतून स्परांना लाभ होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
        श्री. दयानंद कांबळे यांनी प्रस्ताविक भाषणात राष्ट्रीय कार्यशाळेमागील भूमिका मांडली. बदलत्या माध्यामांच्या जगात प्रभावीपणे शासकीय जनसंपर्क होण्यास या चार दिवशी राष्ट्रीय कार्यशाळेचा उत्तम उपयोग होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
                        महाराष्ट्र परिचय केंद्र ठरले पहीले आयएसओ कार्यालय
        महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली, हे कार्यालय आएसओ ९००१:२००८ प्रमाणीत झाले आहे. या कार्यक्रमात महासंचालकांच्या हस्ते महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद काबळे यांना आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या बरोबरच महाराष्ट्र परिचय केंद्र हे आयएसओ प्रमाणपत्र ्राप्त करणारे राज्याच्या माहिती जनसंपर्क विभागाचे पहीले कार्यालय ठरले आहे.
                             प्रथमच वेबकास्टच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण
आजच्या उदघाटन सोहळयाचे थेट प्रक्षेपण महासंचालनालयाच्या www.mahanews.gov.in या संकेतस्थळावर आणि सर्व प्रकारच्या स्मार्ट फोनवर उपलब्ध करून देण्यात आले. यासोबतच वेबकास्टच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करणारे महाराष्ट्र परिचय केंद्र,नवी दिल्ली माहिती विभागाचे  पहीले कार्यालय ठरले आहे.
  उदघाटन सत्र आणि आजच्या सत्रांचे रेकॉर्डेड लाईव्ह वेबकास्ट महासंचालनालयाच्या www.mahanews.gov.in या संकेतस्थळावर आणि  सर्व प्रकारच्या स्मार्ट फोनवर खालील लिंकद्वारे बघता येतील.
http://cdn.app1.ivb7.com/HybridPlayer/PlayerSettings.cshtml?playerid=f23076
         कार्यक्रमाचे सूत्र संचालन अर्चना मिरजकर यांनी केले तर महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांनी आभार प्रदर्शन केले.
            महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ अधिका-यांसह राजस्थान, झारखंड, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाना,कर्नाटक, तामीळनाडू, सिक्कीम, मणिपूर, दिल्ली, नागालँड, अंदमान व निकोबार या राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतून माहिती व जनसंपर्क विभागाचे एकूण ३६ अधिकारी  या कार्यशाळेत सहभागी  झाले आहेत. उदघाटन सत्रानंतर आज पहिल्या सत्रात सामाजिक माध्यमे आणि जनसंपर्कया विषयावर नॅशनल मिडीया सेंटरचे संचालक बी. नारायण यांनी तर ब्लॉगींग एण्ड पर्सनल ब्रँण्डींगया विषयावर सुनिता बिध्दू यांनी  मार्गदर्शन केले. तर दुपारच्या सत्रात कटेंट ड्रिस्टीब्युशन इन टुडेच मोबाईल वर्ड या विषयावर रजनील यांनी मार्गदर्शन केले.  दिनांक २६ फेब्रुवारी पर्यंत ही कार्यशळा चालणार आहे.
                                                                0000000
सूचना : सोबत फोटो जोडले आहेत.