Thursday 28 February 2019

' महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिका-यांना गृहमंत्री पदक'







नवी दिल्ली, 28 :  महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिका-यांना गुन्हे अन्वेषणातील गुणवत्तेसाठी गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने आज 25 राज्य, केंद्रशासित प्रदेश व केंद्रीय तपास यंत्रणेत कार्यरत असणा-या 101 पोलीस अधिका-यांना गृहमंत्री पदक जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील 11 पोलीसांचा यात समावेश आहे. मध्य प्रदेशातील 11 पोलीस अधिकारी, सीबीआयचे 9 अधिकारी तसेच राजस्थान व उत्तर प्रदेशातील प्रत्येक 7 पोलीस अधिका-यांचा यात समावेश आहे. देशातील 12 महिला पोलीस अधिका-यांनाही गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे.
महाराष्ट्रातील खालील पोलीस अधिका-यांना गृहमंत्री पदक जाहिर झाले आहे.
राज तिलक रोशन ( पोलिस उपायुक्त), दिपक पुंडलिक देवराज (पोलिस उपायुक्त), सुरज पांडुरंग गुरव (पोलिस उपाधिक्षक), रमेश नागनाथ चोपडे( सहाय्यक पोलिस आयुक्त), दिनेश विठ्ठलराव आहेर (पोलिस निरीक्षक), शशिराज गुंडोपंत पाटोळे ( पोलिस निरीक्षक), चिमाजी जगन्‍नाथ आढाव ( पोलिस निरीक्षक), सुरज जयवंत पडावी ( पोलिस निरीक्षक), सुनिल किसन धनावडे ( पोलिस निरीक्षक), सचिन मुरारी कदम (पोलिस निरीक्षक) आणि धनंजय चित्‍तरंजन पोरे (सहाय्यक पोलिस निरीक्षक) यांचा समावेश आहे.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                                        00000
दयानंद कांबळे/वि.वृ.क्र.87 /दि 28.02.2019

‘डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम’ पुरस्काराने महाराष्ट्रातील 5 अधिकारी सन्मानित







नवी दिल्ली, 28 : ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ या प्रतिष्ठित पुरस्काराने महाराष्ट्रातील 5 वरिष्ठ अधिका-यांना उपराष्ट्रपती एम.वैकय्या नायडु यांच्या हस्ते गौरवविण्यात आले.

येथील प्रवासी भारतीय केंद्रात “कल्पकता आणि प्रशासन” याविषयावर दिनदयाल संशोधन संस्था आणि युनायटेड नेशन ग्लोबल काम्पेक्टच्यावतीनें ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षता उपराष्ट्रपती एम.वैकय्या नायडु यांनी केली. यावेळी देशभरातील विविध विभागातील उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारांना सन्मानित करण्यात आले. यामधे महाराष्ट्रातील 5 वरिष्ठ अधिका-यांचा समावेश आहे.
 
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी. बक्षी, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामीण उद्योग बोर्डाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, महाराष्ट्र शासनाच्या वस्तु व सेवाकर विभागाचे आयुक्त राजीव जलोटा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी . अनबालगन, ठाणे शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर या पाच वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांना त्यांनी प्रशासनामधे केलेल्या उल्लेखनीय कार्यसाठी यावेळी ‘डॉ. अब्दुल कलाम’ याप्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
00000
 
अंजु निमसरकर/वि.वृ.क्र.86/दि 28.02.2019

Wednesday 27 February 2019

PM confers First NYP Festival Prize To Maharashtra’s Shweta Umre




New Delhi, Feb 27: Maharashtra’s Shweta Umre topped the National Youth Parliament Festival 2019 and was felicitated at the hands Prime Minister Shri Narendra Modi today.
The event was organized by the Ministry of Youth Affairs and Sports. In an award ceremony held today at the Vigyan Bhawan, the top three winners were women.  The National Level Finals of the National Youth Finals concluded yesterday and the top three winners were Shweta Umre from Maharashtra, Anjanakshi M.S. from Karnataka and Mamta Kumari from Bihar who was on the third position. Present during this time was Union Youth Affairs and Sports Minister (I/C), Col. Rajyavardhan Rathore.
A total of 56 participants across the country were here in the last and final competition. Shweta Umre was the topmost finalist and was felicitated with cash money of Rs 2 lakhs, a trophy and a citation.

Greatly Indebted to the People of Maharashtra For Boosting Me

After the receipt of her award, Shweta Umre was welcomed at Maharashtra Information Centre.  The Deputy Director, Shri Dayanand Kamble presented her a bouquet. While asking her about this journey, she explained that this festival was jointly organized by National Service Scheme (NSS) and Nehru Yuva Kendra Sangathan (NYKS), under the aegis of Ministry of Youth Affairs and Sports.  The youth under the age bracket of 18-25 years was invited to participate in the District, State and National level Youth Parliaments.  Before speaking about her whole journey of two months, she expressed her gratitude towards all the people of Maharashtra and said that she was greatly indebted to all the State for imparting moral values, education and supporting her in her endeavors all the time. Further she said, she was selected at Nagpur, the district she hails from and further participated in the State level competition at Savitribai Phule Pune University. She topped the same and was here to participate in the National Level Parliament Festival.  She was here in the national capital and participated on 26th and 27th of February.  Finally, she emerged as a winner and today she sounded extremely happy sharing her thoughts.
Informing further, Shweta said that the Festival was organized at four levels—City, District, State and National Level. She participated at Nagpur’s Matruseva Sangh Mahavidyalaya and the topic assigned was, ‘Initiatives taken by Government of India against Terrorism’.  At State Level, the topic assigned was, ‘Digital India as a Bridge between the Urban and Rural Divide’. She was the winner both the times.  At National level, the topic of discussion was, ‘Connecting India economically, geographically with cultural aspects’. Here again she was the topper. She has won around 250 awards so far in various fields and is presently pursuing her last year degree course at Government Institute of Forensic Sciences. When asked her about her dreams, she came up with that she wants to become a Film Director.
Shweta’s Mother Dr. Savita Sharma is working as a Research Officer at National Ayush Ministry’s Regional Office at Nagpur and her Father, Shri Shirish Umre is a Director at CSR, Mumbai.

*****************

बोदवड परिसर सिंचन योजनेचा उर्वरित 433 कोटींचा निधी मिळणार : जलसंपदा मंत्री गिरीष महाजन








नवी दिल्ली, 27 : जळगाव जिल्हयातील बोदवड परिसर सिंचन योजनेसाठी केंद्राकडून मंजूर निधीपैकी उर्वरित 433 कोटी 44 लाखांचा निधी राज्याला मिळणार असून या प्रकल्पाच्या कामाला गती येईल अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिली.

श्रमशक्ती भवन येथे आज केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील महत्वाच्या सिंचन प्रकल्पांबाबत झालेल्या बैठकीत श्री. महाजन उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

या योजनेसाठी केंद्राकडून दयावयाचा उर्वरित 433 कोटी 44 लाखांचा निधी राज्याला लवकरच देण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी दिल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले. या संबंधात केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या तांत्रिक सल्लागार समितीला श्री गडकरी यांनी आजच्या बैठकीत सूचना दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र शासनाने मंजूर केले होते 500 कोटी

या सिंचन योजनेसाठी वर्ष 2012 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने 500 कोटी रूपये विशेष सहायता निधी म्हणून मंजूर केले होते. यानुसार 2014 -15 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेसाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली पैकी केंद्राकडून प्रत्यक्ष 66.66 कोटींचा निधीच राज्याला प्राप्त झाला. यानंतर केंद्राकडून राज्याला निधी उपलब्ध झालेला नसल्याने या प्रकल्पाच्या कामाचा वेग मंदावला आहे. हा प्रकल्प वर्ष 2020 पर्यंत पूर्ण करण्याच्या उदिष्टय असून केंद्राकडून उर्वरित निधीची मागणी आजच्या बैठकीत श्री. महाजन यांनी केली.
 
42 हजार 420 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

जळगाव जिल्हयातील बोदवड तालुक्यातील बोदवड परिसर सिंचन योजना एक महत्वाकांक्षी योजना असून 193 दशलक्षघन मीटर क्षमतेच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील 42 हजार 420 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

याबैठकीत जळगाव जिल्हयातील गिरणा नदिवर उभारण्यात येणा-या 7 बलून बंधा-याला केंद्र शासनाकडून अनुदान मिळण्याबाबत व राज्यातील 5 आकांक्षी जिल्हयात केंद्रीय योजनांमधून सिंचन व्यवस्था बळकट करण्याबाबतही चर्चा झाल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.

 
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 84 / दिनांक 27.2.2019

Maharashtra WR Minister Urges Centre To Release 433 Cr Under Jalgaon’s Bodwad Parisar Sinchan Yojana






New Delhi, Feb. 27: “The long pending Bodwad Parisar Sinchan Yojana (BPSY) of Jalgaon District in Maharashtra finally got a green signal from the Central Government and it would release the balance financial assistance of Rs 433 crores sooner, informed Maharashtra’s Water Resources Minister, Shri Girish Mahajan here today.

The Minister, Shri Mahajan was here in the National Capital to meet the Union Water Resources Minister, Shri Nitin Gadkari and deliberate on the various irrigation projects concerning the State. Shri Nitin Gadkari chaired a meeting at Shram Shakti Bhawan, which was attended by Union WR Secretary, Shri U.P.Singh, Minister Shri Girish Mahajan, Principal Secretary of Water Resources Department, Shri I.S.Chahal and many senior officers from Union Finance Ministry, NITI Aayog, Water Resources Ministry and State’s WR department.

Many issues concerning irrigation projects of Maharashtra were deliberated upon. Amongst them, the first issue taken up was regarding BPSY.  This irrigation project was sanctioned way back in the Year 2012.  The Cabinet Committee for Infrastructure, GoI had sanctioned Rs 500 Cr for this project as a One Time Grant-in-Aid.  The rest of the expenditure to be incurred in completing this project was to be borne by the State Government. This project has an irrigation potential of 42420 ha and storage creation of 193 Mm3. The MoUs were signed and the first installment of Rs 66.66 cr was released to the State Government in the Year 2014.  However, due to some technical issues, the project could not be taken up for execution. However, the project was speeded up and the central funding assistance of Rs 66.66 cr has been utilized by the State Government, informed Shri Mahajan. An urge to release the balance amount of Rs 433.34 crores was made to the Union Minister, Shri Gadkari, informed Shri Mahajan.  Adding further he said that, the Union Minister has assured of providing the balance amount of Rs 433.34 cr to the State Government.   Shri Mahajan also said that this project has obtained all the statutory clearances like forest, Environmental, CWC, Investment and other necessary clearances as required.

The second major issue that saw a breakthrough was regarding the construction of seven Barrages with smart pneumatically operated weirs/ Balloon Weirs or Rubber Dams at the Girna River of Jalgaon District, informed Shri Mahajan.  Informing further, he said that Baloon weirs are used where quick closing and opening is required. These Baloon weirs are beneficial when there are sudden floods.  These Baloon weirs would be deflated and the storage of water can be retained, once there is a flash flood. The traditional K.T.Weirs cannot be successful in these conditions, and construction of Baloon weirs was a solution to this project, informed the Minister.  The area of Malegon District is a drought prone area, as a result this project would come as a boon, and he urged the union Minister to consider this project as a special case and treat as a pilot project.  The union minister gave a patient ear to this issue and assured of all the necessary support and cooperation in this regard. 

**************


'महारेरा' ला राष्ट्रीय ई- गर्व्हनन्स पुरस्कार



नवी दिल्ली, 27 : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणास (महारेरा) डिजिटल क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल आज राष्ट्रीय ई- गर्व्हनन्स पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केंद्रीय राज्य मंत्री  (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  पुरस्कार महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी  आणि विभागाचे सचिव वसंत प्रभू यांनी स्वीकारला. 
            येथील डॉ. आंबेडकर अंतरराष्ट्रीय सभागृहात केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी विभागातर्फे राष्ट्रीय ई- गर्व्हनन्स पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  यावेळी केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी मंत्रालयाचे  केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री जितेंद्र सिंग, विभागाचे सचिव के.वी.इपन, अतिरिक्त सचिव वी. श्रीनिवास आणि वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित होते. 
            पुरस्कार स्वीकारल्यानंतर महारेराचे अध्यक्ष श्री चॅटर्जी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले,  केंद्र शासनाने स्थावर संपदा नियमन विकास कायदा २०१६  मध्ये पारीत  केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी महारेराची स्थापना २०१७ केली.  महारेराच्यावतीने या कायदयाची अमलबजावणी पूर्णत: डिजिटल स्वरुपात होत आहे. इतर राज्याच्या तुलनेने महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन विकास कायदा अंतर्गत येणा-या नियमांचे पालन शंभर टक्के करीत असल्याचेही माहिती श्री चॅटर्जी यांनी दिली.
१९,५०० पेक्षा अधिक स्थावर संपदांची नोंदणी महारेराकड़े झालेली असून २० लाख लोकांना त्यांची घरे मिळालेली आहे.  महारेराकड़े २० हजार पेक्षा अधिक रियल इस्टेट ऐंजटची नोंदणी आहे. आतापर्यंत महारेराकडे ६,००० तक्रारी नोंदविण्यात आलेल्या असून यापैकी ४,००० पेक्षा अधिक तक्रारीच्या  निपटारा झालेला आहे.
  स्थावर संपदा नियमन विकास कायदा २०१६ अंतर्गत स्थावर संपदेशी संबधित सर्व माहिती सार्वजनिक असावी यावर भर देण्यात आलेले आहे. यासह ग्राहकांच्या तक्रारी वेळेचा आत सोडविण्यात यावे असे नियम आहेत.   महारेरा ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून स्थावर संपदेशी निगडीत सर्व तक्रारींचा निपटारा करीत असल्याचे श्री चॅटर्जी यांनी सांगितले.   
            ई- गर्व्हनन्सचा वापर करुन एखादया क्षेत्रात प्रचंड बदल घडविता येतो, हे महारेराने सिद्ध करुन दाखविले असल्याची प्रतिक्रिया महारेराचे सचिव वसंत प्रभू यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली.  महारेराचे संपूर्ण काम डिजिटल पध्द्तीने होत असून किमान सरकार कमाल शासन  या सूत्रावर आधारित आहे.  महारेराचे काम ऑनलाइन असल्यामुळे तक्रारींच्या निपटा-याचे कालमर्यादा निर्धारित वेळेत पूर्ण केली जात असल्याचीही माहिती श्री प्रभू यांनी दिली.

नागपुरची श्वेता उमरे ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात’ देशात प्रथम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सन्मान




नवी दिल्ली, 27 : राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात नागपुरच्या श्वेता उमरे यांनी बाजी मारत देशात पहिला क्रमांक पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज श्वेता उमरे यांना ‘राष्ट्रीय युवा ससंद पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
            केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज ‘ राष्ट्रीय युवा संसद महोत्सव- 2019’ च्या पहिल्या तीन विजेत्यांना पंतप्रधान मोदी  यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री  कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड आणि मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी यावेळी उपस्थित होत्या.
या महोत्सवात सहभागी झालेल्या देशातील 56 युवकांमधून सर्वोत्तम तीन पुरस्कार विजेत्या मुलीच ठरल्या असून नागपूरच्या श्वेता उमरे यांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2 लाख रुपये , सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बेंग्लुरु (कर्नाटक)ची एम.एस.अंजनाक्षी द्वितीय तर  पटना (बिहार)ची  ममता कुमार तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.  
मला उत्तम संस्कार व शिक्षण देणा-या महाराष्ट्रातील जनतेचे आभार-
                                                                    श्वेता उमरे
        केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाअंतर्गत’  गेल्या दोन महिन्यात विविध स्तरांवर यशस्वी ठरत, राष्ट्रीय स्तरावर अंतिम फेरीत प्रथम आल्याचा खूप आनंद असून यासाठी मला उत्त्तम संस्कार व शिक्षण देणा-या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानते, अशा भावना श्वेता उमरे यांनी व्यक्त केल्या.
                श्वेता उमरे यांनी मिळविलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आज महाराष्ट्र परिचय केंद्रात निमंत्रित करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देवून श्वेता उमरे यांचा सत्कार केला. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेदरम्यान श्वेता उमरे यांनी या स्पर्धे विषयी माहिती दिली.
       
              असे सर केले स्पर्धेचे टप्पे
                राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमात देशभरातील तरूण-तरूणी  सहभागी  झाल्या . स्पर्धेअंतर्गत शहर, जिल्हा , राज्य आणि राष्ट्रीय अशा चार स्तरांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. नागपूर येथील मातृसेवा संघ महाविद्यालयात यावर्षी जानेवरी महिन्याच्या पहिल्या आठवडयात शहरस्तरावरील स्पर्धा झाली. पुढे याच महाविद्यालयातदहशतवादा विरूध्द केंद्र शासनाने उचलले पाऊलया विषयांवर जिल्हास्तरीय स्पर्धेत श्वेता प्रथम आली. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘देशातील शहरी व ग्रामीण भागाला जोडणारा दुवा म्हणून डिजीटल इंडियाचे योगदानया विषयावरील स्पर्धेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयांतून पहिले तीन विजेते असे एकूण 116 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविणारी नागपूरची श्वेता उमरे आणि वर्धा येथील आयुषी चव्हाण यांनी दिल्ली येथे 26 27 फेब्रुवारी 2019  आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले.
        अंतिम स्पर्धेत भारत देशाच्या एकात्मतेत आर्थिक-भौगोलिक आणि सांस्कृतिक बाबींचे योगदान या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत देशभरातील 28 राज्यांतील 56 प्रतिनिधींचा सहभाग होता. याच स्पर्धेत श्वेता  देशात प्रथम ठरल्या व पंतप्रधानांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.   
                          आतापर्यंत 250 पुरस्कार पटकावले
       नागपूर येथील नंदनवन भागात राहणा-या श्वेता उमरे यांनी 10 वी पासूनच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला त्यांनी आतापर्यंत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावंरील 500 हून अधिक स्पर्धांमध्ये भाग घेत 250 पुरस्कार पटकाविले आहे. सध्या नागपूर येथील शासकीय न्याय सहायक विज्ञान महाविद्यालयात (फॉरेन्सीक सायन्स) पदवीच्या अंतिम  वर्षात श्वेता शिकत आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी देश विदेशात घडणा-या दररोजच्या घडामोडी तसेच राजकीय व सामाजिक बदलांचा बारकाईने अभ्यास आणि विविध विषयांवर वाचन करीत असल्याचे श्वेता यांनी सांगितले. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉ. .पी.जे. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र व साहित्य आपण वाचले असून वक्तृत्व स्पर्धेत याचा खूप फायदा झाल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.
        श्वेताची आई डॉ. सविता शर्मा या नागपूर स्थित केंद्रीय आयुष विभागाच्या प्रादेशिक कार्यालयात संशोधन अधिकारी आहेत तर वडील शिरीष उमरे हे  मुंबई येथे खाजगी कंपनीत संचालक आहेत. श्वेता यांचा आवडीचा विषय इंग्रजी असून चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात करिअर करण्याचे त्यांचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                      
                                           0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 82 / दिनांक  27.2.2019