Saturday 25 November 2023

राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा








 

नवी दिल्ली,26: महाराष्ट्र सदन येथे आज संविधान दिनसाजरा करण्यात आला. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामुहिकपणे वाचन करण्यात आले.

 यावेळी निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग  ,सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावर  यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंह यांच्या उपस्थित राज्य घटनेच्या  उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

 

यावेळी निवासी आयुक्त सिंह यांनी राज्य घटनेच्या उद्देशिकेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, संविधान उदेशिका ही आपल्या देशाच्या मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या उद्देशिकांवर आधारित आपण एक सुखी, समृद्ध आणि न्याय्य समाजाची निर्मिती करू शकतो.

 

या कार्यक्रमाला सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावर यांच्यासह महाराष्ट्र सदनातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते..

 

0 0 0 0 0

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.208  / दिनांक 26.11.2023

 

 

Sunday 19 November 2023

राजधानीत इंदिरा गांधी यांची जयंती साजरी





नवी दिल्ली, 19:  देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात, निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त  डॉ. राजेश अडपावार  यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते.

           यावेळी रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी  शपथ दिली.   


00000000000000

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 205, दि.19.11.2023


 

Wednesday 15 November 2023

राजधानीत बिरसा मुंडा जयंती साजरी





नवी दिल्ली, 15 : लोकनायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

 

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव व निवासी आयुक्त श्री रुपिंदर सिंग यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व  श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.   

 

 

00000000000000

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 203, दि.15.11.2023



 

Tuesday 14 November 2023

राजधानीत पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी




नवी दिल्ली, 14 : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

         कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव व निवासी आयुक्त श्री रुपिंदर सिंग यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व  श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

  

00000000000000

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 201, दि.14.11.2023



 

Friday 10 November 2023

छंद देई आनंद’ कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान




बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांनी पुरस्काराने सन्मानित

 

साहित्य अकादमीचे 23 भाषांतील ‘बाल’ साहित्य पुरस्कार प्रदान

 

नवी दिल्ली, 9:अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमीचा ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास आज प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार या कवितासंग्रहाचे  कवी व बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांनी स्वीकारला.

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार 2023 चा प्रदान सोहळा समारंभ त्रिवेणी कला संगममंडी हाऊसनवी दिल्ली येथे गुरुवारी सांयकाळी संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि अभ्यासक हरीश त्रिवेदीसाहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिकउपाध्यक्ष कुमुद शर्मा आणि अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांच्या हस्ते सन्माननीय साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साहित्य अकादमीच्या वर्ष 2023 च्या बाल साहित्य पुरस्कारासाठी 23 प्रादेशिक भाषांमधील  साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली होती. यामध्ये रविंद्रनाथ गोस्वामी (आसामी)श्यामलकांती दाश (बंगाली)प्रतिमा नंदी नार्जारी (बोडो)बलवान सिंग जमोडिया (डोगरी)सुधा मूर्ती (इंग्रजी)रक्षाबेहेन पी. दवे (गुजराती)सूर्यनाथ सिंग (हिंदी)विजयश्री हालाडि (कन्नड) , तुकाराम रामा शेट (कोंकणी)अक्षय आनंद 'सनी' (मैथिली)प्रिया ए.एस. (मल्याळम)दिलीप नाडमथन (मणिपुरी)एकनाथ आव्हाड (मराठी)मधुसूदन बिष्ट (नेपाळी)जुगल किशोर षडंगी (ओडिया),गुरमीत कडिआलवी (पंजाबी)किरण बादल (राजस्थानी)राधावल्लभ त्रिपाठी (संस्कृत)मानसिंग माझी (संताली)ढोलन राही (सिंधी)के. उदयशंकर (तमिळ)डी.के. चादुवुल बाबू (तेलुगु) आणि स्वर्गीय मतीन अचलपुरी (उर्दू) यांचा समावेश आहे. 

पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असे आहे. मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्य‍िक डॉ. अक्षय कुमार काळेबाबा भांड आणि प्रो (डॉ.) विलास पाटिल यांचा समावेश होता.

                               ‘छंद देई आनंद’ या काव्यसंग्रहाविषयी

‘छंद देई आनंद’ मराठी बालकविता संग्रहात, इतिहासविज्ञानपर्यावरण आणि संस्कृतीबद्दलची माहिती सोप्या भाषेत मांडली गेली आहे. हा संग्रह वाचकांना समाजवनस्पती आणि प्राण्यांबद्दल शिक्षित व जागरूक करतो, मुलांचे मनोरंजन करतो आणि त्यांना जीवनातील विविध उपयुक्त गोष्टींचे महत्त्व समजण्यास आणि चांगल्या सवयी विकसित करण्यास मदत करतो. कवितांची लय मंत्रमुग्ध करणारी आहे आणि हे कार्य पालकशिक्षक आणि निसर्गाबद्दल प्रेमआपुलकी आणि आदर आकर्षित करते.

 

 

बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या विषयी

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार व कथाकथनकार. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली ३० वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली ३० वर्षे मुलांसाठी कथाकवितानाट्यछटाचरित्रकाव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन करतात.

साने गुरुजींची कथाकथन परंपरा पुढे नेण्यासाठी नेहमी प्रयत्नरत असतात. कथाकथनातील योगदानाबद्दल अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथानिवेदक साने गुरुजी पुरस्काराचे मानकरी आहेत. बोधाईगंमत गाणीअक्षरांची फुलेशब्दांची नवलाईछंद देई आनंदपाऊस पाणी हिरवी गाणी हे बालकवितासंग्रहआनंदाची बागएकदा काय झालं!, खळाळता अवखळ झरा आणि इतर कथाप्रकाशाचा उत्सव हे बालकथासंग्रहमजेदार कोडीआलं का ध्यानात?, खेळ आला रंगात हे काव्यकोडी संग्रहमला उंच उडू दे हा नाट्यछटासंग्रहमिसाईल मॅन हे चरित्र... आदि त्यांनी लिहिलेले पुस्तके आहेत.  त्यांच्या काही पुस्तकांचे हिंदीइंग्रजी भाषांमध्ये आणि ब्रेल लीपीमध्ये देखील अनुवाद झालेले आहेत. त्यांची जवळपास ३० पुस्तके प्रसिद्ध असून, त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा वा.गो.मायदेव पुरस्कारबालकवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

00000000000