Thursday 26 July 2018

‘एनआरआय विवाह’ आणि ‘मानवी तस्करी’ विषयांवर आज राष्ट्रीय परिषद



परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते होणार उद्घाटन

नवी दिल्ली, 26 : एनआरआय विवाह आणि  मानवी तस्करी - समस्या आणि उपाययोजना या  विषयांवर शुक्रवारी, दि. 27 जुलै रोजी महाराष्ट्र सदन येथे राष्ट्रीय परिषद होणार असल्याची माहिती,  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा  विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

            परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे  उद्घाटन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री  सुषमा स्वराज यांच्या हस्ते होणार आहे. तर, समारोपीय कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू आणि केंद्रीय महिला व  बाल कल्याण मंत्री मनेका गांधी उपस्थितअसणार आहेत.  
            या राष्ट्रीय परिषदेत  एनआरआय विवाह आणि मानवी तस्करी – समस्या  आणि उपाययोजना या विषयांवर दोन सत्रांचे आयोजन करण्यात आलेले असून, यावेळी  विस्तृत चर्चा होणार आहे. या चर्चेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा, देशभरातील विविध राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा, सदस्य उपस्थित राहतील. यासह बाल हक्क आयोग,  मानवी हक्क आयोग, विविध गैरसरकारी संस्था तसेच विषयांशी संबंधित सखोल अभ्यासकही  सहभागी होणार आहेत.       
            यावेळी पिडीत विवाहित महिला ज्यांना शासनाच्या मदतीने न्याय मिळाला. तसेच, मानवी तस्करीतून सूटका झालेल्या प्रातिनिधीक माहिला स्वानुभव सांगतील.


No comments:

Post a Comment