Thursday, 1 May 2025

महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कला सादरीकरणाने ‘महाराष्ट्र दिन’ राजधानीत उत्साहात साजरा







नवी दिल्ली, 1 मे :  महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानी दिल्लीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गणेशवंदनाआषाढी वारीगोंधळधनगर नृत्यभारूडपोवाडाअभंगदिवलीकोळी नृत्यासह महाराष्ट्र गीत’ अशा विविध समृध्द कलाकृतींचे दमदार सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडले.

 

दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनाच्या बँक्वेट हॉलमध्ये आज महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. दरम्यानपहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी श्री. संजीव कुमारश्री. राजेश अग्रवालश्रीमती सुमन चंद्रा यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावारस्मिता शेलारसारिका शेलारपरिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरामाहिती अधिकारी अंजु निमसरकरमहाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक    आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनानेही यानिमित्त राज्याच्या समृद्ध सांस्कृतिकऐतिहासिक वारश्याचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने अमये पाटील यांच्या भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स संस्थेच्या  कलाकारांनी 'गर्जा महाराष्ट्र माझाकार्यक्रम सादर केला.

 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिकऐतिहासिक वारश्याचे दर्शन

 

श्री गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जिजाऊ वंदनाछत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक गीतमहाराणी ताराराणीपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वंदना गीतआषाढी वारीसादरीकरण झाले. रांगड्या आवाजात डफाच्या तालावर शिवाजी महाराजांच्या पोवाडयाने मनाचा ठेका धरला. आई अंबाबाईचे जागरणगोंधळ सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावले. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे  प्रति‍बिंब उभे केलेकार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

  

००००००००००००

अंजू निमसरक,मा.अ./वि.वृ.क्र.98 /दि.01.05.2025


 

महाराष्ट्र आणि गुजरात देशाच्या विकासात आणि जागतिक पटलावर नाव चमकणारे राज्य: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 






नवी दिल्ली दिनांक 1 : भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भुमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात  राज्यांचा  राज्य आज दिवस आहे. या दोन्ही राज्यांना त्यांच्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देत हा प्रवास असाच सुरू राहील असे प्रतिपादन प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी आज येथे केले.

 

 दिल्लीतील उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या मार्गदर्शनात सायंकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि  केंद्रीय मंत्री गृह श्री शाह यांच्या प्रमुख महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा राज्य दिवस आज  डीडीए असिता ईस्ट पार्कविकास मार्ग येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री शाह बोलत होते. 

या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळेकेंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवी यादिल्लीचे तसेच गुजरातचे राज्यमंत्रीमहाराष्ट्र सदन च्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमलामहाराष्ट्र आणि गुजरात चे दिल्ली स्टिक विविध क्षेत्रातील निवासी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता पार्क हे जनतेसाठी खुले करण्यात आले. 

यावेळी श्रीमती आर. विमला यांनी उपराज्यपाल श्री सक्सेना,  केंद्रीय गृहमंत्री श्री शाहश्रीमती रेखा गुप्ता यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

 

ते पुढे म्हणालेगुजरात व महाराष्ट्र यांनीकोणताही वाद न घालताएकाच राज्यातून निर्माण झालेले दोन स्वतंत्र राज्य म्हणून परस्पर सन्मान राखत आणि आरोग्यदायी स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.

 

पंतप्रधान मोदींनी "एक भारतश्रेष्ठ भारत" या संकल्पनेद्वारे भाषिक व सांस्कृतिक विविधतेतून एकतेचा संदेश दिला असून आज विविध भाषा व संस्कृती एकमेकांना बळ देतात.

 

व्यक्ती मनोमन ठरवले की फूट निर्माण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अंत करायचा आहेतर त्याचे आदर्श उदाहरण मोदींनी "एक भारतश्रेष्ठ भारत" ची कल्पना साकारून दाखवले आहे.

 

महाराष्ट्रही वीर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमीत्यांनी आणि बाजीराव पेशव्यांसारख्या सेनानींनी मुगल सत्तेला जबरदस्त प्रतिकार देत स्वराज्यस्वधर्म व स्वभाषेचे रक्षण केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हे लोकमान्य टिळकांनी पुढे नेले.

 

सामाजिक सुधारणाभक्ती चळवळ यामध्ये महात्मा फुलेबाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांचे योगदान संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायक ठरले.

 

गुजरातजेथे श्रीकृष्णांनी जीवन व्यतीत केलेतेथे स्वामी दयानंद सरस्वतीमहात्मा गांधी व सरदार पटेल यांसारख्या थोर नेत्यांचा जन्म झाला. त्यांनी स्वातंत्र्य चळवळ घडवून आणली.

 

स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकात्मतेसाठी व प्रगतीसाठी गुजरात व महाराष्ट्र या राज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज महाराष्ट्रात गरबा तर गुजरातमध्ये गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो. ही परस्पर संस्कृतीची देवाणघेवाण भारताची खरी ताकद आहे.

 

महाराष्ट्र हे देशाची आर्थिक राजधानी असून गुजरातची जीएसडीपी ३० लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. गुजरातमध्ये देशातील सर्वात मोठा बंदररिफायनरीएशियातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पार्कपहिली बुलेट ट्रेनगिफ्ट सिटी आणि आता धोलेरा स्मार्ट सिटी उभी राहत आहे.

 

वायब्रंट गुजरात आणि मॅग्निफिसंट महाराष्ट्र हे दोन्ही राज्य भारताच्या विकासाचे मजबूत स्तंभ आहेत. दोन्ही राज्यांनी २०४७ पर्यंतचा आपला विकास आराखडा निश्चित केला आहे.

 

या दोन राज्यांनी आपल्या वारशाचा सन्मान राखत आधुनिकतेला स्वीकारले असून देशाच्या एकात्मतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. मोदींनी मांडलेली महान भारताची संकल्पना साकार करण्यासाठी ही राज्ये आरोग्यदायी विकास स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करत आहेत.

 

२०४७ मध्ये जेव्हा भारत विकसित राष्ट्र बनेलतेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र यांचा सर्वाधिक वाटा असेल.

 

००००००००००००

अंजू निमसरक,मा.अ./वि.वृ.क्र.97 /दि.01.05.2025


Wednesday, 30 April 2025

राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा



















 

नवी दिल्ली, 01 : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. उभय महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.

 

कस्तुरबा गांधी मार्गस्थित आणि कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीतासोबत राज्य गीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा…’ गाऊन ध्वजवंदन केले. 

 

या कार्यक्रमास अपर निवासी आयुक्त डॉ. नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरजीत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर व कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सदनात निवासी असणारे अभ्यागत, दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम

 

दिल्ली शासनाचे उपराज्यपाल कार्यालयातर्फे सायंकाळी महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना,  मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि  केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विशेष कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.

 

यावेळी दिल्लीत विविध क्षेत्रांत कार्यरत मराठी भाषिक मान्यवरांशी संवाद साधून त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे प्रदर्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे.

 

कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याचा जागर करणारा खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याच्या सहकार्याने आणि कोकण हापूस आंबा उत्पादक संघ, देवगड, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 व 2 मे दरम्यान भौगोलिक मानांकन प्राप्त हापूस आंब्याचे विक्री प्रदर्शनाचे आज उद्घाटन करण्यात आले. निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले. 

 

या निमित्ताने ‘महाराष्ट्राचा सुगंधी राजा’ हापूस आंब्याची खरेदी करण्याचीही सुवर्णसंधी दिल्लीकरांना उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांत मराठी आणि अमराठी भाषिक दिल्लीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा आणि सांस्कृतिक वैभव सर्वांपर्यंत पोहोचणार आहे

 

००००००००००००

अमरज्योत कौर अरोरा/वि.वृ.क्र.96 /दि.01.05.2025

Maha Info Centre, Delhi चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला 

 

एक्स - 

https://x.com/MahaGovtMic 

https://x.com/micnewdelhi 

https://x.com/MahaMicHindi

फेसबुक - https://www.facebook.com/share/158d8aFtyi/ 

 युट्यूब -

https://youtube.com/@mahainfocentrenewdelhi?si=ketpBLnSkQRTnAVx 

या लिंकवर फॉलो करा


 

Sunday, 30 March 2025

राजधानीत गुढीपाडवा उत्साहात साजरा गुढीपाडवा सकारात्मकतेचा आणि नवउत्साहाचा सण- सचिव तथा निवासी आयुक्त आर.विमला










नवी दिल्ली, 30: महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत, राजधानीतील दोन्ही महाराष्ट्र सदनात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.

गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू असलेला नववर्ष स्वागताचा सण संपूर्ण देशभर मोठ्या श्रद्धेने आणि आनंदात साजरा करण्यात येतो. राजधानी नवी दिल्लीतही महाराष्ट्र सदनाच्या वतीने कॉपर्निकस मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांनी गुढी उभारली. त्यानंतर कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी गुढी प्रतिष्ठापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी सुमनचंद्रा, भारतीय प्रशासकीय सेवेतील अन्य वरिष्ठ अधिकारी, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, श्रीमती सारिका शेलार, यांसह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र सदनात स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठमोळ्या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. पुरणपोळी, मसालेभात, सोलकढी यांसारख्या अनेक पारंपरिक पदार्थांचा आस्वाद सर्वानी घेतला.

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत, निवासी आयुक्त आर. विमला यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत गुढीपाडव्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व यावेळी विशद केले. "गुढीपाडवा हा नवउत्साह, समृद्धी आणि सकारात्मकतेचा सण आहे. महाराष्ट्राबाहेरही तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, ही अभिमानास्पद गोष्ट आहे," असे म्हणत, त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या व नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धीचे आणि आनंददायी जावो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

00000000000000

अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र.84 /दि.30.03.2025

या लिंकवर फॉलो करा

https://x.com/MahaGovtMic 


 

Monday, 17 February 2025

राजधानीत अभिजात मराठीचा अभुतपूर्व जागर






अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम

 नवी दिल्ली, दि.17: यंदाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या शुक्रवारपासून नवी दिल्ली येथील ताल कटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होणार आहे. या संमेलनात दि. 21 ते 23 फेब्रुवारीपर्यंत कवी संमेलन ,मुलाखत, परिसंवाद, परिचर्चा असे वेगवेगळे एकापेक्षा एक सरस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजक असणाऱ्या सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी आज महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

         ताल कटोरा स्टेडीअममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत 98 वे साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी साडेतीनला विज्ञान भवनात आयोजित होणाऱ्या उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिक मोठ्या संख्येने या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

 त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल.

             तत्पूर्वी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार असून नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, ‍मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील.  

 पहिल्या दिवशी सायंकाळी अखेरच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तसेच दिल्लीतील निवडक नामवंत कवी सहभागी होणार आहेत.

 

सभामंडपांची नावे

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिराव फुले अशा महापुरुषांच्या नावे सभामंडप असून प्रवेशद्वाराला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. 

             संमेलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रकाशकांचे स्टॉल असणार आहेत, तसेच याठिकाणी 'संत महापती' मंच असून तिथे इच्छूक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होईल. या साहित्य संमेलनास देशाबाहेरूनही साहित्यिक मंडळी येणार असल्याची माहिती श्री नहार यांनी दिली.

         शनिवारी 22 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप येथे ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या विषयावर मान्यवरांची मुलाखत, ‘मनमोकळा संवाद मराठीचा अमराठी संसार’, विशेष सत्कार सत्र, ‘लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी’, ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ आणि सायंकाळी ‘मधुरव’ हा सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे.

           याच दिवशी यशवंतराव चव्हाण सभा मंडप येथे ‘बहुभाषिक कवी संमेलन’, बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसांचे जीवन व साहित्य’, ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ अशा विषयावर परिसंवाद आहेत. तर महात्मा ज्योतिराव फुले सभा मंडप येथे कवी कट्टा आयोजित करण्यात आला आहे.

             रविवारी शेवटच्या दिवशी 23 फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप येथे ‘असे घडलो आम्ही’ या विषयावर मुलाखत, ‘सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य, ‘नाते दिल्लीशी मराठीचे’ आदी कार्यक्रम आहेत. यशवंतराव चव्हाण सभा मंडप येथे ‘अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत', ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व सृजनशीलता’ या विषयावर परिसंवाद आहेत. सायंकाळी 'खुले अधिवेशन व समारोप’ असे सत्र असणार आहे.

 

साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे

19 फेब्रुवारीला पुणे येथून  विशेष रेल्वे दिल्लीसाठी येणार असून या रेल्वेमध्ये देखील साहित्य संमेलन होणार आहे.  या विशेष रेल्वेला महादजी शिंदे एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रेल्वे डब्याला गड-किल्ल्यांची नावे देण्यात आलेली आहेत. या रेल्वेमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत असणार आहेत

 *****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर/वृत्त वि. क्र.45  / दिनांक 17.02.2025


 

Saturday, 15 February 2025

राजधानीत संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी




 

नवी दिल्ली, 15 : संत सेवालाल महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

 

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावर यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात आज संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)( प्रशासन) हेमराज बागुल यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी कार्यालयातील उपस्थीत अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

*****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर/वृत्त वि. क्र.43  दिनांक 15.02.2025

 

Tuesday, 11 February 2025

महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मिळणे हे सौभाग्य : एकनाथ शिंदे





उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान


नवी दिल्ली दि. 11 : महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त होणे हे माझे सौभाग्य असल्याचे मी समजतो असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

येथील महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 'महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार' सोहळयाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी शिंदे बोलत होते. श्री एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप पाच लक्ष रुपये रोख सन्मानचिन्ह व शिंदे शाही पगडी असे आहे. पुरस्काराची राशी आणि स्वतःकडून पाच लाख रुपये सरहद संस्थेला देण्याचे श्री शिंदे यांनी मंचावरून जाहीर केले.

श्री शिंदे पुढे म्हणाले, महादजी शिंदे यांचे कर्तुत्व रणांगणावर जेवढे प्रखर होते तेवढेच ते कवी, अभंगकार म्हणूनही सुप्रसिद्ध होते. ग्वालेर येथील धृपद घराणे आणि खयाल गायकी घराण्याची कितीतरी गीते त्यांनी लिहिलेली आहेत. या त्यांच्या कार्याचा उल्लेख श्री शिंदे यांनी केला.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमात पराक्रमी महादजी शिंदे यांचा इतिहास असावा यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी मंचावरून दिले.

महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार हा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना, भाऊंना आणि महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करीत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आपण आतापर्यंत काम करीत आहोत. आज मिळालेला हा पुरस्कार कामाची पोचपावती असल्याचे श्री शिंदे यावेळी म्हणाले.

श्री पवार यांनी यावेळी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमामुळे दिल्लीतील मराठी लोकांना मानसिक समाधान मिळत असल्याचे भावना व्यक्त केल्या. तसेच हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक दिल्लीतील मराठी माणूस आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. साहित्य संमेलनानिमित्त मराठी माणसाला एक पर्वणीच त्यांना लाभलेली असल्याचे श्री पवार यावेळी म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महादजी शिंदे यांच्या इतिहासातल्या नोंदी उलगडल्या. दिल्लीत वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या होणाऱ्या कर्तुत्ववान मराठी व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी केले. सूत्रसंचालन निवेदिता वैशंपायन यांनी तर आभार प्रदर्शन सहसंयोजक लेशपाल जवळगे यांनी केले. शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाचा तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम यावेळी झाला.

*****************

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अंजु निमसरकर/वृत्त वि. क्र.35 / दिनांक 11.02.2025