Friday, 8 August 2025

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी - मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी



नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलावण्याची मागणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कडे केली.

तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक हित आणि कृषी कार्यक्षमता वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवत मंत्री रावल यांनी केंद्रीय योजना तयार करण्याची विनंतीही यावेळी केली.  गेल्या तीन दिवसापासून मंत्री रावल दिल्ली दौऱ्यावर होते, दरम्यान त्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची  भेट घेतली.

 

मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी नमूद केले की, महाराष्ट्रासह देशभरात कांदा, डाळी, संत्री, डाळिंब, केळी आणि फुले यांसारख्या शेती उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, अपुऱ्या बाजार यंत्रणा आणि वैज्ञानिक साठवणूक सुविधांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. शेतमाल काढणी पश्चात अपुऱ्या साधनांमुळे काही प्रमाणात नुकसान होते. याचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि देशाच्या कृषी कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

 

श्री रावल यांनी शेतमालाला योग्य किंमत मिळवून देण्यासाठी विशेष समर्थन योजना, विकेंद्रित वैज्ञानिक साठवणूक सुविधा, थंड साखळी, डिजिटल सूची व्यवस्थापन आणि कार्यक्षम रसद प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला. बाजार माहिती प्रणालीच्या एकत्रीकरणाद्वारे उत्पादन आणि किंमतीच्या ट्रेंडचा अचूक अंदाज घेऊन शेतकऱ्यांना वेळेवर माहिती पुरवण्यावरही त्यांनी भर दिला. यामुळे धोरणकर्त्यांना माहितीवर आधारित निर्णय घेता येतील.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधुनिकीकरणासाठी मंत्री रावल यांनी केंद्रीय योजना तयार करण्याची मागणी केली, ज्यामध्ये झाकलेली लिलाव व्यासपीठे, ग्रेडिंग-तोलन व्यवस्था, थंड साठवण, कोरडे कोठार, पॅकेजिंग केंद्रे आणि कचरा व्यवस्थापन सुविधांचा समावेश आहे. एपीएमसी परिसरातील न वापरलेल्या जागेत लहान अ‍ॅग्रो-प्रोसेसिंग युनिट्स, शेतकरी-केंद्रित सुविधा उभारण्यासाठी प्रोत्साहन आणि तांत्रिक सहाय्य देण्याची विनंतीही त्यांनी केली. तसेच, ई-नाम सारख्या डिजिटल व्यासपीठांशी एपीएमसीला जोडण्यासाठी अनुदान आणि क्षमता बांधणीवर जोर देण्यात यावा असे सांगितले.

 

या बैठकीतून ठोस रोडमॅप तयार करून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाऊ शकते, असे रावल यांनी सांगितले. अशा उपायांमुळे शेती व्यवसाय टिकाऊ होईल आणि भारताची आंतरराष्ट्रीय शेती बाजारातील नेतृत्व भूमिका अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

0000

महाराष्ट्र परिचय केंद्रनवी दिल्ली - वृत्त विशेष - 171

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi


 

Sunday, 3 August 2025

राजधानीत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी





नवी दिल्ली, 03 : स्वातंत्र्यसंग्रामातील महान सेनानी, ‘परदेशी नव्हे, स्वराज्य हवे’ या विचारांचा पुरस्कार करणारे क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

कोपर्निकस मार्ग येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ सहायक कक्ष अधिकारी सारिका शेलार यांच्यासह  उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी नाना पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याचा आणि सातारा  प्रजासत्ताक स्थापन करण्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा परिचय उपस्थितांना करून दिला.

 

या कार्यक्रमास महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  

000000000000

 

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली  वृत्त विशेष 163

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi


 

Friday, 1 August 2025

71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा श्यामची आई चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार






नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 ची घोषणा केली. यामध्ये सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, आशिष भेंडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आत्मपॅम्फलेट तसेच नाळ 2 चित्रपटाला स्वर्ण कमल पुरस्कार घोषित झाला आहे.

सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जिप्सी या चित्रपटातील बाल कलाकार कबीर खंडारे तर त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोखले आणि भार्गव जगताप यांना संयुक्तपणे नाळ 2 चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.

यावेळी ४० फीचर चित्रपट पुरस्कार, १५ नॉन-फीचर पुरस्कार आणि १ चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. फीचर चित्रपट पुरस्कार निवडीच्या ज्युरीचे नेतृत्व आशुतोष गोवारीकर, नॉन-फीचर ज्युरीचे नेतृत्व पी. शेषाद्री आणि चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन ज्युरीचे नेतृत्व गोपाळकृष्ण पै यांनी केले. २०२३ वर्षामधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फीचर, नॉन फीचर आणि चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट लेखन अशा तीन विभागांमध्ये जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार लवकरच प्रदान केले जाणार आहेत.

सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कार 

हिंदी चित्रपट ’१२ वी फेल’ला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपट पुरस्कार जाहीर झाला. जवान चित्रपटासाठी शाहरुख खान आणि ’१२ वी फेल’साठी विक्रांत मेस्सी यांना संयुक्तपणे ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार जाहीर झाला. राणी मुखर्जीला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.

‘आत्मपॅम्फलेट’साठी आशिष बेंडे यांना पुरस्कार

दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट पुरस्कार मराठी दिग्दर्शक आशिष बेंडे यांना जाहीर झाला आहे. आत्मपॅम्फलेट या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - कटहल- अ जॅकफ्रुट मिसरी, सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सुदिप्तो सेन, द केरला स्टोरी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उर्वशी, उलोझुक्कु, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजयराघवन आणि मुथुपेट्टई सोमू भास्कर, राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट - सॅम बहादुर पुरस्कार घोषित करण्यात आला.

000000000000

 

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली  वृत्त विशेष - 162

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi

  

 

पंतप्रधानांचे नागरिकांना आगामी स्वातंत्र्यदिनाच्या संदर्भात संकल्पना पाठविण्याचे आवाहन

नवी दिल्ली दि. 1 - भारत देश यंदा 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी करत आहे.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना मांडण्यासाठी आमंत्रित केले आहे. 

 “आपल्या एक्स पोस्टवर केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, या वर्षीच्या जवळ येत असलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मी माझ्या भारतीयांच्या संकल्पना जाणून घेण्यास उत्सुक आहे! या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपणास कोणते विषय किंवा संकल्पना प्रतिबिंबित झालेल्या ऐकायला आवडतील?” यासाठी नागरिकांनी MyGov आणि NaMo App वरील खुल्या मंचावर आपले विचार व्यक्त करावेत असे आवाहन केले आहे. अधिक माहिती साठी https://www.mygov.in/group-issue/let-your-ideas-and-suggestions-be-part-pm-modis-independence-day-speech-2025/ या संकेत स्थळाला अवश्य भेट द्या. 

                                                                    000000000000 

 महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष - 161 
 एक्स वर आम्हाला फॉलो करा: 
 https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi

Tuesday, 29 July 2025

राजधानीत अखिल भारतीय शिक्षा समागम 2025 संपन्न केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते समागमचे उद्घाटन आणि संबोधन राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची उपस्थिती


 

नवी दिल्ली, 29 : भारतीय शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात मोलाचा बदल ठरलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाला पाच वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने आज ' अखिल भारतीय शिक्षा समागम 2025'  या कार्यक्रमाचे आयोजन भारत मंडपम, येथे करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध राज्यातील शिक्षण मंत्री, प्रधान सचिव, शिक्षणतज्ज्ञ आणि इनोव्हेटर्स यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे विभागाचे प्रधान सचिव श्री रणजीत सिंग देवल उपस्थित होते.

 

महाराष्ट्राचे कार्य राष्ट्रीय पातळीवर गौरवले!

 

या भव्य समारंभात महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री  दादाजी भुसे आणि प्रधान सचिव श्री रणजीत सिंग देवल यांनी सादर केलेली सादरीकरण विशेष चर्चेचा विषय ठरले. या सादरीकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये  राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या अंमलबजावणीसाठी राबवलेली धोरणात्मक पावले, शिक्षक प्रशिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN), शालेय मूल्यांकन प्रणाली व भाषिक समावेश यांसारख्या महत्त्वाच्या कामांची माहिती देण्यात आली. शिक्षण मंत्री यांच्यासोबत सुकाणू समितीचे सदस्य आणि शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी होते.

राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले आणि अन्य राज्यांनीदेखील या मॉडेलचा अभ्यास करावा असे मत मांडले.

माध्यमिक शिक्षणात सक्रीय सुधारणा या चर्चासत्रात मंत्री श्री भुसे यांनी सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्ती नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

महाराष्ट्राने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत संपूर्ण देशात आदर्श ठरवण्याचे कार्य केले असून, अशा शैक्षणिक समागमातून शालेय शिक्षणात गुणवत्तात्मक परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होत आहे. आजच्या झालेल्या सत्रांमध्ये राज्याच्यावतीने महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण व अध्यापनातील बदल यावर शिक्षण तज्ञ सचिन जोशी यांनी मार्गदर्शन चर्चेत सहभाग घेतला.

 

000000000

महाराष्ट्र परिचय केंद्रनवी दिल्ली- वृत्तविशेष - 156

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi



Monday, 28 July 2025

दिल्लीमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक भवनाचा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर



नवी दिल्ली, 28 :  दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र शासनामार्फत  दिल्लीमध्ये बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र सदन परिसरात त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून त्याचा प्रस्तावित आराखडा निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकताच सादर केला.

 

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावेळी महाराष्ट्र सदनाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत श्रीमती आर विमला यांनी विविध प्रस्ताव सादर केले.  यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक भवनाबाबत सविस्तर चर्चा झाली. या सांस्कृतिक भवना मध्ये बहूउद्देशीय सभागृहमहाराष्ट्रातील भारतीय प्रशासकीय सेवेतील विविध पदांसाठी मुलाखत पात्र उमेदवारांसाठी निवास व्यवस्थाप्रशस्त ग्रंथालय व अभ्यासिका व अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.  

 

तसेच महाराष्ट्र सदन परिसरातील अधिकारी व कर्मचारी निवास स्थाने आणि अन्य प्रशासकीय बाबींसंदर्भात  सविस्तर सादरीकरण निवासी आयुक्त श्रीमती विमला यांनी केले. यासह महाराष्ट्रातील ऋतूनिहाय  फळांचे प्रदर्शन व विक्री दालन आणि बचत गटांच्यामार्फत उत्पादित वस्तूचे प्रदर्शन दालन वर्षभरासाठी य ठिकाणी असावे या संदर्भात सुरु असलेल्या नियोजनची माहिती यावेळी देण्यात आली. महाराष्ट्र महोत्सव दिल्लीत आयोजित करण्यात यावा यामध्ये  महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडाविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे प्रस्तावित आहेत. यासाठी निधी उपलब्ध करून द्यावाअशी मागणी श्रीमती विमला यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यासर्व प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविली असून पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

 

       या सादरीकरणास सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलारमहाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक मनीषा पिंगळेसार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता किरण चौधरी,  विद्युत विभागाचे आशुतोष द्विवेदीमाहिती अधिकारी अंजु निमसरकर कांबळे, महाराष्ट्र सदनाचे प्रभारी व्यवस्थापक प्रमोद कोलपते आदी उपस्थित होते.


000000000

महाराष्ट्र परिचय केंद्रनवी दिल्ली - वृत्त विशेष - 155

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic / https://x.com/micnewdelhi / https://x.com/MahaMicHindi



 

Wednesday, 11 June 2025

महाराष्ट्राच्या सागरी विकासासाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्रीय मंत्र्यांशी संवाद





 

नवी दिल्ली दि. 11 :  महाराष्ट्रातील सागरी क्षेत्राचे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान आहे. महाराष्ट्राचे सागरी क्षेत्र अधिक सक्षम व्हावे यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची दिल्ली येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

 

महाराष्ट्र सागरी मंडळाने (MMB) सागरमाला योजनेअंतर्गत आतापर्यंत 12 प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले असून, त्यासाठी 230.24 कोटी रुपये गुंतवणूक झाली आहे. सध्या 783.08 कोटी रुपये खर्चाच्या 14 प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. त्यापैकी 8 प्रस्ताव सागरमाला योजनेसाठी मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या प्रगतीसाठी मंजुरी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या बैठकीत आगामी काळात राज्यातील बंदरे विभागात करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

सागरी क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर संवाद घडवून आणण्यासाठी, महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB), मुंबई पोर्ट प्राधिकरण (MbPA), जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA), भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (IWAI) आणि शिपिंग महासंचालनालय (DGS) यांसारख्या प्रमुख संस्थांची त्रैमासिक संयुक्त बैठक घेण्याबाबत मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना विनंती केली.  विविध संस्थांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आणि धोरणात्मक निर्णय अधिक प्रभावीपणे घेण्यासाठी या बैठका उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी यावेळी  व्यक्त केला.

 

 

000000000000

अंजू निमसरकर – माहिती अधिकारी / वृत्त विशेष  -128

आम्हाला फॉलो करा

एक्स - 

https://x.com/MahaGovtMic 

https://x.com/micnewdelhi 

https://x.com/MahaMicHindi
 

राजधानीत महाराष्ट्राची सर्वांगीण प्रतिमा जोपासण्याचे उल्लेखनीय कार्य महाराष्ट्र परिचय केंद्राचे : निवासी आयुक्त आर. विमला





 

 

नवी दिल्ली, दि. 11: राजधानी मध्ये महाराष्ट्राची सर्वांगीण प्रतिमा जोपासण्याचे  महत्त्वाचे  कार्य  गेली 65 वर्ष महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून होत आहॆ. या कार्यालयाने विविध उपक्रम राबवून मराठीजणांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी परिचय केंद्राच्या सदिच्छा भेटी दरम्यान केले.

 

परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती)  मनिषा पिंगळे यांनी श्रीमती आर. विमला यांचे स्वागत केले. नुकतीच प्रकाशित झालेली खासदार पुस्तिका ही त्यांना भेट देण्यात आली. माहिती केंद्राने आजपर्यंत राबविलेल्या विविध उपक्रम, प्रकाशने, तसेच मेळावे यांची माहिती  देण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्र आणि महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून येत्या काळातील विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.  

 

यावेळी श्रीमती आर. विमला यांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. केंद्राच्या ग्रंथालयाला भेट दिली.  ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तके आणि संदर्भ साहित्याची त्यांनी प्रशंसा केली. भेटीनंतर त्यांनी अभिप्राय नोंदवताना लिहिले, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे भेट देण्याचा अनुभव अत्यंत समाधानकारक ठरला. केंद्रातर्फे प्रकाशित पुस्तके आणि ग्रंथालयातील साहित्य उत्तम आहे. केंद्राचे कार्य खूपच कौतुकास्पद आहे. सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा. या अभिप्रायातून त्यांनी केंद्राच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 

यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर कांबळे, लघुलेखक कमलेश पाटील, अधीक्षक रघुनाथ सोनवणे, ग्रंथपाल रामेश्वर बरडे, सहाय्यक अधीक्षक राजेश पागदे, सहायक ग्रंथपाल निलेश देशमुख, वरिष्ठ लिपिक प्रशांत शिवरामे, उदय वीर सिंग, किशोर वानखेडे, पाले, किशोर गायकवाड, आमिका महतो, दीपक देशमुख हे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

000000000000

अंजू निमसरकर – माहिती अधिकारी / वृत्त विशेष  -129

आम्हाला फॉलो करा

एक्स - 

https://x.com/MahaGovtMic 

https://x.com/micnewdelhi 

https://x.com/MahaMicHindi

Thursday, 1 May 2025

महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कला सादरीकरणाने ‘महाराष्ट्र दिन’ राजधानीत उत्साहात साजरा







नवी दिल्ली, 1 मे :  महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानी दिल्लीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गणेशवंदनाआषाढी वारीगोंधळधनगर नृत्यभारूडपोवाडाअभंगदिवलीकोळी नृत्यासह महाराष्ट्र गीत’ अशा विविध समृध्द कलाकृतींचे दमदार सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडले.

 

दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनाच्या बँक्वेट हॉलमध्ये आज महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. दरम्यानपहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी श्री. संजीव कुमारश्री. राजेश अग्रवालश्रीमती सुमन चंद्रा यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावारस्मिता शेलारसारिका शेलारपरिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरामाहिती अधिकारी अंजु निमसरकरमहाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक    आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनानेही यानिमित्त राज्याच्या समृद्ध सांस्कृतिकऐतिहासिक वारश्याचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने अमये पाटील यांच्या भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स संस्थेच्या  कलाकारांनी 'गर्जा महाराष्ट्र माझाकार्यक्रम सादर केला.

 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिकऐतिहासिक वारश्याचे दर्शन

 

श्री गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जिजाऊ वंदनाछत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक गीतमहाराणी ताराराणीपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वंदना गीतआषाढी वारीसादरीकरण झाले. रांगड्या आवाजात डफाच्या तालावर शिवाजी महाराजांच्या पोवाडयाने मनाचा ठेका धरला. आई अंबाबाईचे जागरणगोंधळ सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावले. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे  प्रति‍बिंब उभे केलेकार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

  

००००००००००००

अंजू निमसरक,मा.अ./वि.वृ.क्र.98 /दि.01.05.2025


 

महाराष्ट्र आणि गुजरात देशाच्या विकासात आणि जागतिक पटलावर नाव चमकणारे राज्य: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 






नवी दिल्ली दिनांक 1 : भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भुमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात  राज्यांचा  राज्य आज दिवस आहे. या दोन्ही राज्यांना त्यांच्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देत हा प्रवास असाच सुरू राहील असे प्रतिपादन प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी आज येथे केले.

 

 दिल्लीतील उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या मार्गदर्शनात सायंकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि  केंद्रीय मंत्री गृह श्री शाह यांच्या प्रमुख महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा राज्य दिवस आज  डीडीए असिता ईस्ट पार्कविकास मार्ग येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री शाह बोलत होते. 

या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळेकेंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवी यादिल्लीचे तसेच गुजरातचे राज्यमंत्रीमहाराष्ट्र सदन च्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमलामहाराष्ट्र आणि गुजरात चे दिल्ली स्टिक विविध क्षेत्रातील निवासी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता पार्क हे जनतेसाठी खुले करण्यात आले. 

यावेळी श्रीमती आर. विमला यांनी उपराज्यपाल श्री सक्सेना,  केंद्रीय गृहमंत्री श्री शाहश्रीमती रेखा गुप्ता यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

 

ते पुढे म्हणालेगुजरात व महाराष्ट्र यांनीकोणताही वाद न घालताएकाच राज्यातून निर्माण झालेले दोन स्वतंत्र राज्य म्हणून परस्पर सन्मान राखत आणि आरोग्यदायी स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.

 

पंतप्रधान मोदींनी "एक भारतश्रेष्ठ भारत" या संकल्पनेद्वारे भाषिक व सांस्कृतिक विविधतेतून एकतेचा संदेश दिला असून आज विविध भाषा व संस्कृती एकमेकांना बळ देतात.

 

व्यक्ती मनोमन ठरवले की फूट निर्माण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अंत करायचा आहेतर त्याचे आदर्श उदाहरण मोदींनी "एक भारतश्रेष्ठ भारत" ची कल्पना साकारून दाखवले आहे.

 

महाराष्ट्रही वीर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमीत्यांनी आणि बाजीराव पेशव्यांसारख्या सेनानींनी मुगल सत्तेला जबरदस्त प्रतिकार देत स्वराज्यस्वधर्म व स्वभाषेचे रक्षण केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हे लोकमान्य टिळकांनी पुढे नेले.

 

सामाजिक सुधारणाभक्ती चळवळ यामध्ये महात्मा फुलेबाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांचे योगदान संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायक ठरले.

 

गुजरातजेथे श्रीकृष्णांनी जीवन व्यतीत केलेतेथे स्वामी दयानंद सरस्वतीमहात्मा गांधी व सरदार पटेल यांसारख्या थोर नेत्यांचा जन्म झाला. त्यांनी स्वातंत्र्य चळवळ घडवून आणली.

 

स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकात्मतेसाठी व प्रगतीसाठी गुजरात व महाराष्ट्र या राज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज महाराष्ट्रात गरबा तर गुजरातमध्ये गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो. ही परस्पर संस्कृतीची देवाणघेवाण भारताची खरी ताकद आहे.

 

महाराष्ट्र हे देशाची आर्थिक राजधानी असून गुजरातची जीएसडीपी ३० लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. गुजरातमध्ये देशातील सर्वात मोठा बंदररिफायनरीएशियातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पार्कपहिली बुलेट ट्रेनगिफ्ट सिटी आणि आता धोलेरा स्मार्ट सिटी उभी राहत आहे.

 

वायब्रंट गुजरात आणि मॅग्निफिसंट महाराष्ट्र हे दोन्ही राज्य भारताच्या विकासाचे मजबूत स्तंभ आहेत. दोन्ही राज्यांनी २०४७ पर्यंतचा आपला विकास आराखडा निश्चित केला आहे.

 

या दोन राज्यांनी आपल्या वारशाचा सन्मान राखत आधुनिकतेला स्वीकारले असून देशाच्या एकात्मतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. मोदींनी मांडलेली महान भारताची संकल्पना साकार करण्यासाठी ही राज्ये आरोग्यदायी विकास स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करत आहेत.

 

२०४७ मध्ये जेव्हा भारत विकसित राष्ट्र बनेलतेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र यांचा सर्वाधिक वाटा असेल.

 

००००००००००००

अंजू निमसरक,मा.अ./वि.वृ.क्र.97 /दि.01.05.2025