Wednesday 28 September 2016

पिकांच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राची 1,269 कोटींचे अर्थसहाय्य


नवी दिल्ली : महराष्ट्रातील दुष्काळग्रस्तभागातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राने 1 हजार 269 कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग, गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी आणि गृह, वित्त आणि कृषी विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील दूष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय पथकाने दिलेल्या प्रस्तावाचे अवलोकन करून केंद्र शासनाने 1 हजार 269 कोटी रूपयांची आर्थिक सहाय्य महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहे. यामध्ये 589.46 कोटी रूपये हे खरीप पिकांच्या तर 679.54 कोटी रूपयें रब्बी पिकांच्या नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment