Thursday 22 December 2016

सरंक्षण राज्यमंत्री श्री भामरे यांच्या प्रयत्नांमुळे शेतक-यांना जमीनी परत मिळणार



नवी दिल्ली 22 : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांमुळे नाशिक जिल्हयातील शेतक-यांना जमीनी परत मिळणार आहेत.
       
वर्ष 1964 मध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने रेल्वे सायडिंग बांधण्यासाठी नाशिक जिल्हयातील  ओझर, कोकणगाव, दिक्षी, जिवाळे, थेरगाव, कसबे-सुकेणे आणि पिंपळस(रामाचे) या गावांमधील जवळपास 196 एकर जमीन अधिग्रहीत केली होती. या जमीनीवर अद्यापर्यंत काहीही बांधकाम झाले नसल्यामुळे त्यांच्या जमीनी परत मिळाव्या अशी, स्थानीक शेतक-यांची मागणी होती. यासाठी सरंक्षण राज्यमंत्री श्री भामरे यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिडेट ही कंपनी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. शेतक-यांना त्यांच्या
 जमीनी परत मिळण्याबाबत एचएएल कार्यवाही करीत आहे.

No comments:

Post a Comment