Friday 25 May 2018

‘पीएमएसबीवाय’अंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ४५ हजार ११५ विमाधारक










नवी दिल्ली दि. २५ : देशातील गरीब जनतेला अत्यल्प दरात अपघात विमा देणा-या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत (पीएमएसबीवाय) आतापर्यंत देशातील उद्दिष्टित १६ हजार ८५० खेडयांमध्ये २६ लाख ११ हजार ७८७ विमाधारकांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रातील उद्दिष्टित १९२ खेडयांमध्ये ४५ हजार ११५ विमा धारकांची नोंद झाली आहे.

        केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वतीने देशातील गोर-गरीब जनतेला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल मानल्या जाणारी प्रधानमंत्री  सुरक्षा विमा योजना १ जून २०१५ पासून सुरु करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे उदघाटन केले. योजनेनुसार वार्षिक १२ रूपये इतका प्रीमिअम असून अपघाती मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबियांस २ लाख रूपये किंवा अपघातात दुखापत झाल्यास उपचारासाठी १ लाख रूपये देण्यात येतात. बँक खाते असणारी १८ ते ७० वयोगटातील व्यक्ती या योजनेस पात्र ठरते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या ग्राम स्वराज विभागाच्यावतीने या योजनेची अंमलबजाणी सुरु असून मागास खेडयांची यासाठी निवड करण्यात आली आहे. आजपर्यंत देशभरातील उद्दिष्टित २७ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील १६ हजार ८५० खेडयांमधे या योजनेच्या माध्यमातून  २६ लाख ११ हजार ७८७ लोकांचा विमा उतरविण्यात आला आहे.     
    
              विदर्भात सर्वात जास्त ३२ हजार ६६८ विमाधारक
             ही योजना राबविण्यासाठी  राज्यातील एकूण २३ जिल्हयांतील १९२ खेडयांची निवड करण्यात आली  व पीएमएसबीवाय योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी  सुरु आहे. यानुसार विदर्भातील सर्वच ११ जिल्हयांतील १४०  खेडयांतील ३२ हजार ६६८ लोकांचा विमा उतरविण्यात आला. मराठवाडयातील ७ जिल्हयातील ३९ खेडयांतील ६ हजार ९९२, पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हयातील ९ खेडयांतील २०९७ लोकांना आणि खान्देशातील दोन जिल्हयातील  ३ हजार३५८ जणांना विमा सुरक्षा देण्यात आली आहे.


                पीएमएसबीवाय योजनेंतर्गत विदर्भात गडचिरोली जिल्हयात सर्वात जास्त विमा उतरविण्यात आला. गडचिरोली जिल्हयातील ८ खेडयांतील १२ हजार २६७ जणांचा विमा उतरविण्यात आला आहे. यासोबत अकोला जिल्हयातील ३४ खेडयांमधील २ हजार ७३६, अमरावती जिल्हयातील २५ खेडयांमधील ८०१ हजार ८९०, भंडारा जिल्हयातील ७ खेडयांतील १ हजार ३१६, बुलडाणा जिल्हयातील २२ खेडयांतील ४ हजार ९८४,चंद्रपूर जिल्हयातील ७ खेडयांतील ४ हजार १५६, नागपूर जिल्हयातील ४ खेडयांतील १हजार ११, गोदिंया जिल्हयातील ३ खेडयांतील ३१९, वाशिम जिल्हयातील १५ खेडयांतील १ हजार ४४१, यवतमाळ जिल्हयातील १३ खेडयांतील १ हजार ११३  आणि वर्धा जिल्हयातील २ खेडयांतील ४३५ जणांचा या योजनेंतर्गत विमा उतरविण्यात आला आहे.
           
                                        मराठवाडयात ६ हजार ९९२ विमाधारक

            या योजनेंतर्गत मराठवाडा विभागात लातूर जिल्हयात सर्वात जास्त १ हजार ६३६ जणांचा वीमा उतरविण्यात आला या जिल्हयातील ७ खेडयांमध्ये ही अंमलबजावणी झाली. औरंगाबाद जिल्हयातील एका खेडयातील ३४१, बीड जिल्हयातील ३ खेडयांतील ५०८, हिंगोली जिल्हयातील ५ खेडयांतील ८०१, उस्मानाबाद जिल्हयातील २ खेडयांतील १ हजार १२५, नांदेड जिल्हयातील २० खेडयांतील १ हजार ६११ आणि जालना जिल्हयातील एका खेडयातील ९७० जणांचा या योजनेंतर्गत विमा उतरविण्यात आला.

                                        पश्चिम महाराष्ट्रात २ हजार ९७ विमाधारक
        पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयात या योजनेंतर्गत सर्वात जास्त १ हजार १३५ जणांचा विमा उतरविण्यात आला आहे, या जिल्हयात एकूण ७ खेडयांमध्ये ही योजना राबविण्यात आली.  तसेच सातारा जिल्हयातील एका खेडयात ५६५ व कोल्हापूर जिल्हयातील एका खेडयात ३९७  जणांचा या योजनेंतर्गत विमा उतरविण्यात आला आहे .

              खान्देश विभागात अहमदनगर जिल्हयात सर्वात जास्त २ हजार ७२९ जणांचा वीमा उतरविण्यात आला या जिल्हयातील ३ खेडयांमध्ये ही अंमलबजावणी झाली. जळगाव जिल्हयातील एका खेडयामध्ये या योजनेंतर्गत  ६२९ जणांचा वीमा उतरविण्यात आला आहे.                                                                                         
                              000000  

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा  http://twitter.com/micnewdelhi

रितेश भुयार/वृत्त वि.क्र.२०९/दिनांक २५.५.२०१८

No comments:

Post a Comment