Wednesday 14 October 2020

पर्यावरणाची हानी न करता ई-वस्तुंची विल्हेवाट लावणे गरजेचे ; शामलाल गोयल




                      

नवी दिल्ली दि. 14 : सद्या माहिती तंत्रज्ञानाचे युग असून मोठया प्रमाणात ईलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण होत आहे, अशात पर्यावरणाला हानी न पोहचवता या ई-कच-याची  विल्हेवाट योग्य्‍ा प्रकारे होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा अपरमुख्य सचिव शामलाल गोयल यांनी केले आहे.

 

            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहामध्ये आयोजित  तिस-या आंतरराष्ट्रीय ई-कचरा (E-Waste) दिनाच्या कार्यक्रमात श्री गोयल बोलत होते. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव डॉ. निधी पांडे, केंद्रीय पर्यावरण विभागाचे  वरिष्ठ संचालक तथा ज्येष्ठ वैज्ञानिक श्री.धर्मेन्द्र गुप्ता,  करो संभवया सामाजिक संस्थेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी संदीप भार्गव, महाराष्ट्र सदनाचे  सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार  यावेळी  उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. गोयल म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोठया प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक  अर्थात्‍ ई-वस्तू  जसे संगणक,लॅपटॉप,मोबाईल, चार्जर,बॅटरी,माउुस,पेन ड्राईव्ह,सीडी,डीव्हीडी, पेन ड्राईव,कीबोर्ड इत्यादी विविध प्रकारच्या वस्तुंची खरेदी मोठया प्रमाणावर केली जाते. मात्र, या वस्तुंचा वापर संपल्यानंतर या वस्तुंची विल्हेवाट पर्यावरणाला हानी न पोहोचवता योग्य त्याप्रकारे लावण्याची जबाबदारी आपण कटाक्षाने पार पाडली पाहिजे ही काळाची गरज आहे. याप्रकारची ई कचरा दिनानिमित्त प्रतिज्ञाच  आपण सर्वांनी घेतली पाहिजे असे श्री गोयल म्हणाले.

आपण सर्वांनी या ई-कचरा दिनानिमित्त आपल्या घरापासून सुरूवात केली पाहिजे असे मत  श्री.धर्मेन्द्र गुप्ता गुप्ता  यांनी  यावेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. संदीप भार्गव यांनी ई-कचरा या विषयाबाबत सखेाल माहितीपर सादरीकरण केले. यावेळी ई-वेस्टबाबत बोलताना त्यांनी भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर या विषयाबाबत लोकांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होणे महत्वाचे असल्याचे सांगितले.  देशभरात तसेच जगभरात वाढत्या प्रमाणात ई-वस्तुंचा वापर होत असल्याने ई-वेस्ट बाबत सर्वांना साक्षर करणे अतिशय महत्वाचे आहे. या संदर्भातील अनेक महत्वाच्या लहान-सहान बाबींसंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

 धर्मेन्द्र गुप्ता यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनातील स्वागत कक्षात ई-वेस्ट एकत्रित करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कचरा पेटीचे  उदघाटन करण्यात आले.

 

              आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic

                                        000000 

 

 


 

No comments:

Post a Comment