Tuesday 25 May 2021

 ‘खेलो इंडिया’अंतर्गत पायाभूत सुविधेसाठी राज्याला200 कोटींचा निधी मिळावा- क्रीडा मंत्री सुनील केदार 


नवीदिल्ली दि. 25 : खेलो इंडिया अंतर्गत राज्यातील विविध प्रलंबित असणा-या पायाभुतसुविधेसाठी  200 कोटीं रूपयांचा निधीमिळावा, अशी मागणी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आजकेंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे केली. श्री केदार यांनी केंद्रीयक्रीडा मंत्री श्री रिजिजू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनीराज्यातील विविध क्रीडाबांबी चर्चा केली. राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा अधिकसक्षम करण्याकरीता प्रलंबित असलेल्या 37 प्रस्तावासाठी राज्याला खेलो इंडियामधून200 कोटी रूपयांचा निधी मिळावा, अशी मागणी श्री केदार यांनी केली. कांदिवली येथील क्रीडा संकुलसंदर्भात राज्य शासन आणि भारतीयक्रीडा प्राधिकरण (साई) यांच्यामध्ये झालेल्या कराराप्रमाणे अमलबजावणी करण्यातयावी. अशी चर्चा बैठकीत झाली. राज्य शासन आणि साईमध्ये झालेल्या कराराप्रमाणे कांदीवलीयेथील  सराव शिबीराचे औरंगाबाद येथे राज्यशासनानेविनामुल्य उपलब्ध करून दिलेल्या जागेत सराव शिबिरे व्हावीत, अशी मागणीही श्रीकेदार यांनी केली.विदर्भातील आदिवासी भागातील खेळाडुंना अधिक प्रोत्साहन मिळावे,यासाठी दुर्गम भागात केंद्र शासनातर्फे क्रीडा अकादमी सुरू करावी, असा प्रस्तावहीश्री केदार यांनी बैठकीत मांडला. यासह चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे क्रीडासंकुल बांधुन तयार आहे, हे संकुल साईने लीजवर घेऊन याभागातील खेळाडुंना प्रोत्साहनद्यावे, असा प्रस्ताव आज श्री केदारे यांनी केंद्रीय मंत्री श्री रिजिजू यांच्यापुढे मांडला. 

पोल्ट्रीफार्म असणा-यांना योग्य मोबदला मिळावा :सुनील केदार 

पोल्ट्री फार्म असणा-यांनाआपत्ती काळात होणा-या नुकसानीबाबत योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी, आज केंद्रीय पशुसंवर्धन व डेयरीमंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे केली.  बर्ड फ्लुआणि अन्य साथीच्या रोंगामुळे एकाच वेळी अनेक कोबडयांना मारावे लागते. यामुळेपोल्ट्री मालकाचे अतोनात नुकसान होते. अशा वेळी केंद्र व राज्य शासन मिळुन काहीमदत पोल्ट्री फार्म मालकांना केली जाते. मागील 15 वर्षापासून केंद्र आणि राज्यमिळून  प्रत्येक कोबंडयामागे 45:45 रूपये अशी मदत दिलीजाते. ही मदत अपुरी असुन ही आर्थिक मदत वाढवून किमान प्रत्येकी  100:100 रूपये असावी. अशी मागणी श्री केदार यांनी केली. भारतीय गीर जातीच्यागायीवर ब्राझीलमध्ये  संशोधन होऊन अधीकदुधाळ संकर तयार झालेले आहे. ही नवीन संकरीत गीर गाय दिवसाला 25-27 लीटर दूध देते. या गीर जातीच्या गायी भारतात आणुनशेतक-यांना  द्याव्यात जेणे करून शेतक-यांच्याजोडधंधा म्हणुन असणा-या दुग्ध व्यवसायाला भरभराट येईल. अशी माहिती देत या गीर गायीदेशात आणण्याची मागणी श्री केदार यांनी केंद्रीय मंत्र्याकडे केली.यासोबतच सानेन याजातीच्या बक-या ज्या दिवसाला 10-12 लीटर दूध देतात. त्यांना देशात आणव्या जेणेकरून येथील लोकांना या बक-यांच्या दुधातून रोजगार वाढीसाठी मदत होईल, अशी मागणीहीश्री केदार यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली.  या बकरीचे संकर नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनेडा,इजराईल येथे मोठया प्रमाणात आहेत. दुध आणि भाजीपाल्यापासूनबनविण्यात येणा-या लोणीचा फरक समजण्यासाठी दोघांचा  रंग वेगवेगळा असावा, अशी मागणीही श्री केदारयांनी आज केंद्रीय मंत्री श्री गिरीराज सिंह यांच्याकडे केली. दूधापासून तयारहोणार-या लोणीच्या तुलनेत भाजीपाल्यांपासून तयार करण्यात येणा-या  लोणीला कमी गुंतवणूक  लागते. मात्र, बाजारात आल्यावर दोघांची किमतसारखी असते. यामुळे दुधापासून लोणी बनविणा-यांना नुकसान होते.  यासाठी दोन्ही लोणींचा रंग वेगळा असावा. यासह  ग्राहकांनी कोणता लोणी खरेदी केले आहे हेकळण्यासाठी दोघांतील फरक स्पष्ट दिसावा. करिता लोणीचा रंग वेगळा ठेवण्याची, विंनती श्री केदार यांनी केली.

No comments:

Post a Comment