Tuesday 26 April 2022

नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड हे रेल्वेसाठी ही वापरले जावे : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

 






केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे राज्याची मागणी

नवी दिल्ली, 26 एप्रिल : नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड रेल्वेसाठीही वापरले जावे, यासह राज्यांच्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली व याबाबत त्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती, राज्याचे पर्यटन्‍ व पर्यावरण मंत्री, अदित्य ठाकरे यांनी आज  येथे दिली.

      येथील रेल भवनात श्री ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री वैषणव यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील विविध रेल्वे विषयांसोबत मुंबईतील रेल्‍्वे विषयक प्रकल्पांविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर श्री ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड चे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोर्कापण झाले. या कार्डच्या माध्यमातून ‘टॉप इन-टॉप आऊट’ करता येऊ शकते, या कार्डची सेवा बेस्टसाठी वापरली जाईल. या कार्डच्या माध्यमातून डिजीटल सेवेचा उपयोग करता येईल. देशातील सर्व मेट्रोसाठी हे कार्ड वापरता येऊ शकेल, तसेच हे कार्ड रेल्वेसाठी ही वापरता यावे व यासाठीची लागणारी प्रक्रिया केंद्रीय रेल्वे विभागाकडून करण्यात यावी, ही विनंती राज्याच्यावतीने करण्यात आल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या मागणीवर रेल्वे मंत्रालयाचे सकारात्म्क काम सुरू असून याबाबत श्री वैष्णव यांनी सांगितली असल्याची  माहिती श्री ठाकरे यांनी यावेळी दिली. यावेळी खासदार अनिल देसाई आणि प्र‍ियंका चर्तुवेदी उपस्थित होते.

मुंबईतील रेल्वेविषयक समस्या सोडविण्यासाठी नोडल अधिका-याची नेमणूक

      मुंबईतील विविध रेल्वेविषयक समस्या सोडविण्यासाठी समन्वयक म्हणून नोडल अधिकारी नेमला जाईल, अशी माहिती, श्री ठाकरे यांची पत्रकारांना दिली.

      डिलाईल रोडवरील पुल तसेच मुंबईतील रेल्वेच्या अधिनस्थ येणारे पुल संदर्भातील काही परवानग्या तसेच मेट्रो लेन, रेल्वे क्रासिंगच्या, पावसामुळे साचलेल्या पाण्याने निर्माण  होणा-या समस्यांसह इतरविषयी समन्वय साधण्यासाठी रेल्वे विभागाकडून नोडल अधिका-याची नेमणूक केली जाईल. जेणे करून मुंबईच्या रेल्वेविषयक समस्या सोडविण्याला अधिक गती प्राप्त्‍ होईल, अशी माहिती श्री ठाकरे यांनी दिली.  

      धारावी परिसरातील रेल्वे विकासासाठी रेल्वे सोबत राज्य सरकाराचा करार झालेला आहे. यासंदर्भात रेल्वेला निधीही राज्य शासनाने दिलेला आहे. या विषयी सकारात्मक चर्चा झाली असून या सर्व कामांना अधिेक गती मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री ठाकरे यांनी सांगितले.

     श्री ठाकरे यांनी महाराष्ट्र सदन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प्‍ अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी सदनची पाहणी केली तसेच  अधिका-यांसोबत आढावा बैठक घेतली.

No comments:

Post a Comment