Saturday 31 August 2024

राजधानीतील सेंट्रल विस्टा येथे महाराष्ट्र फूड स्टॉलचे उद्घाटन, पारंपारिक महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची चव दिल्लीकरांना अनुभवता येणार !







नवी दिल्ली, 31 : देशाच्या राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सेंट्रल विस्टा येथे  महाराष्ट्राचा फूड स्टॉल कायमस्वरूपी उभारण्यात आलेला आहे.  या स्टॉलचे उद्घाटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते आज झाले.

दिल्लीतील इंडिया गेट जवळ असलेल्या नॉर्थ फूड कोर्टमध्ये हा महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ देणारा स्टॉल सुरू करण्यात आला आहे. या स्टॉलद्वारे दिल्लीला भेट देणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्य संस्कृतीची ओळख करून देणे, या उपक्रमाचा उद्देश आहे. सध्या सेंट्रल विस्टा येथे देशातील 16 राज्यांचे फूड स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये साऊथ साईड आणि नॉर्थ साईड अशा दोन्ही बाजूंना प्रत्येकी आठ-आठ स्टॉल्स आहेत. महाराष्ट्राचा फुड स्टॉल नॉर्थ बाजूने आठ क्रमांकाच्या दालनात उभारण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र फूड स्टॉलवरून दिल्लीकर  विविध पारंपारिक महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील. या स्टॉलचे संचालन श्रीनिवास हॉस्पिटॅलिटी अँड मॅनेजमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड करणार आहे.

या स्टॉलच्या उद्घाटनाने महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. दिल्लीला भेट देणारे पर्यटक या स्टॉलवरून महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोजकुमार सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "महाराष्ट्राची खाद्य संस्कृती जगभर पोहोचवण्याचे आमचे स्वप्न आहे. या दिशेने हे स्टॉल एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे."

सेंट्रल विस्टा येथे सर्व राज्यांचे फूड स्टॉल्स उभे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. यामुळे देशाच्या एकतेची भावना वृद्धिंगत होईल आणि विविध राज्यांची संस्कृतींची देवाण-घेवाण होण्यास मदत होईल.

महाराष्ट्राचा फूड स्टॉल दिल्लीतील सेंट्रल विस्टा येथे उभा राहणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून, खाद्य संस्कृती जगभर पोहोचेल आणि राज्याच्या पर्यटन विकासालाही नवी दिशा मिळेल. दिल्लीकरांना आता पारंपारिक महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची चव त्यांच्या सोईनुसार अनुभवता येणार आहे. 

****************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 110/ दिनांक 31.08.2024

 


 

Friday 30 August 2024

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार




राष्ट्रपतीच्या हस्ते 50 शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार


नवी दिल्ली, 31: शालेय, उच्च, आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.


केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी निवडलेल्या 50 शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके आणि कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बागडे यांचा समावेश आहे.


:: मंतैय्या बेडके विषयी ::
श्री. मंतैय्या बेडके यांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात उत्कृष्ट कार्य करत शाळेची पटसंख्या 8 वरून 138 पर्यंत वाढवली आहे. त्यांनी लोकसहभागातून शाळेत स्मार्ट टीव्ही आणि इन्व्हर्टरसारख्या सुविधा उभारल्या आहेत. त्यांच्या अथक मेहनतीने आणि समर्पणाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे.


:: सागर बागडे विषयी ::
श्री. सागर बागडे गेल्या 30 वर्षांपासून कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देश-विदेशात कार्यक्रम करून दोन विश्वविक्रमही नोंदवले आहेत.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शिक्षकांना 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात पुरस्कार प्रदान करतील. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात प्रशस्ती पत्र, रु.50,000 रोख बक्षीस रक्कम आणि एक रौप्यपदक समाविष्ट आहे.

*****************
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 109/ दिनांक 31.08.2024

Thursday 22 August 2024

स्थावर मालमत्ता क्षेत्राविषयी मंत्री समूहाची त‍िसरी बैठक राजधानीत संपन्न: मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती






नवी दिल्ली, २२: स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित मुद्दयांवर, मंत्री समूहाची तिसरी बैठक नॉर्थ ब्लॉक येथे आज बोलविण्यात आली होती. गोवा राज्याचे मुख्यमंत्री, प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली व यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने महिला व बाल विकास मंत्री, श्रीमती अदिती तटकरे सहभागी झाल्या.

या बैठकीत बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी,  सुरेश खन्ना (अर्थमंत्री, उत्तर प्रदेश), हरपाल एस चीमा (अर्थमंत्री, पंजाब), कनुभाई देसाई (अर्थमंत्री, गुजरात) आणि के एन बालगोपाल (अर्थमंत्री, केरळ) उपस्थित होते. महाराष्ट्राच्या वतीने या बैठकीत श्रीमती. आदिती तटकरे उपस्थित होत्या. या बैठकीत स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर विशेषत: जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास (स्वयं-पुनर्विकास किंवा विकासकामार्फत) आणि झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन या विविध विषयांवर त्यांनी राज्याच्या वतीने मुद्दे मांडले असल्याचे त्यांनी बैठकीनंतर सांगितले.

या बैठकीत पर्यटन प्रकल्पासाठी जमिनीच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावरील कर आकारणीच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. मंत्र्यांच्या समूहाने (GoM) श्रीमती तटकरे यांनी मांडलेल्या मुद्दयांची दखल घेतली गेली असल्याचे तसेच यावर सकारात्मक विचार करण्याचा तसेच पुढील बैठकीत अधिक तपशिलांसह त्यावर अधिक चर्चा करण्याचे ठरविले, असे श्रीमती तटकरे यांनी सांगितले.

**********

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic  

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.102/ दिनांक 22.08.2024


 

Tuesday 20 August 2024

आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी तीन पोलिस निलंबित, फास्टट्रॅक सुनावणी, उज्वल निकम विशेष सरकारी वकील : देवेंद्र फडणवीस



नवी दिल्ली, 20: बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे तसेच, कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नवी दिल्ली येथे ते माध्यमांशी बोलत होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असून, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. संवेदनशीलतेने पोलिस परिस्थिती हाताळत आहेत. ही घटना उघडकीस आल्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. तथापि कुठे काही विलंब असेल तर एसआयटी त्याची चौकशी करेल आणि त्यात दोषी आढळणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

अशा गंभीर घटनांमध्ये न्याय कसा मिळवून देता येईल, याचा प्रयत्न करायचा असतो. सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि त्या मुलींना न्याय देणे याला प्राधान्य आहे. आंदोलकांमध्ये कोण आहेत, यावर या घडीला चर्चा करण्यात अर्थ नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कुचराई करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दुपारी दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

**********

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic  

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.101/ दिनांक 20.08.2024


 

राजधानीत सद्भावना दिन साजरा





 नवी दिल्ली, 20: महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन आज साजरा करण्यात आला.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग  यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. यावेळी श्री रुपिंदर सिंग यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. 

यावेळी सदनातील अपर निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व श्रीमती स्मिता शेलार इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा

महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. श्रीमती अरोरा यांनी यावेळी स्व. राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी स्व. राजीव गांधी यांना यावेळी आदरांजली वाहिली. 

**********

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic  

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.100/ दिनांक 20.08.2024


 

Wednesday 14 August 2024

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण
















नवी दिल्ली, 15: भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रधान सचिव तथा निवासी आयुक्त रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि काॅपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह राष्ट्रगीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे  पथसंचलन  झाले.

 

            या कार्यक्रमास  महाराष्ट्र सदनाच्या यहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार आणि श्रीमती सि्मता शेलारमहाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा  यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र सदनात निवासास असणारे अतिथी तसेच दिल्ली स्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

 

**********

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic  

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र98दिनांक 15.08.2024


 

महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ तर पाच कर्मचाऱ्यांना ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान



नवी दिल्ली, 14: 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त, केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 11 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती शौर्य पदक’ उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवानागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना जाहीर केली जातात. वर्ष 2024 साठी 59 जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 6 अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल एक जवान - संतोष श्रीधर वॉरिकमुख्य अग्निशमन अधिकारी यांना ‘विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीं पदक तर पाच जवानांना ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान करण्यात आला.

देशभरातील उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’4 कर्मचाऱ्यांनाउल्लेखनीय सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि 55 कर्मचार्यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा कामगिरीसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील 6 अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

देशातील 14 कर्मचाऱ्यांना नागरी संरक्षण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘‘नागरी संरक्षण पदक’ तसेच उल्लेखनीय सेवेसाठी ‘ ‘नागरी संरक्षण पदक’ अनुक्रमे 03 कर्मचारी / स्वयंसेवक आणि 11 कर्मचारी/ स्वयंसेवकांना पदक प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान झाली.

 

राज्यातील ‘अग्निशमन सेवा पदके’ आणि  ‘नागरी संरक्षण पदक’ प्राप्त अधिका-यांची नावे-


विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम) अग्निसेवा पदक - श्री संतोष श्रीधर वॉरिकमुख्य अग्निशमन अधिकारी यांना प्रदान करण्यात आला.


गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)- अग्निसेवा पदक

श्री किशोर ज्ञानदेव घाडीगावकरविभागीय अग्निशमन अधिकारी, श्री अनंत भिवाजी धोत्रेउप अधिकारीश्री मोहन वासुदेव तोस्करआघाडीचे फायरमन,  श्री मुकेश केशव काटेलीडिंग फायरमन आणि श्री किरण रजनीकांत हत्यालअग्निशमन अधिकारी यांचा समावेश आहे.


विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम)- नागरी संरक्षण पदक अशोक बोवाजी ओलंबाहवालदार यांना प्रदान करण्यात आले आहे.


गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)- )- नागरी संरक्षण पदक

श्री नितीन भालचंद्र वयचलप्राचार्य, शिवाजी पांडुरंग जाधवजेलर ग्रुप-1, श्री दीपक सूर्याजी सावंतसुभेदार आणि श्री जनार्दन गोविंद वाघहवालदार यांचा समावेश आहे.

**********

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic  

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 97दिनांक 14.08.2024

 

 


 

महाराष्ट्रातील तीन पोलिस अधिका-यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान 17 पोलिस अधिकारी ‘पोलीस शौर्य पदक’ व 39 पोलिस कर्मचाऱ्यांना ‘पोलीस पदक” प्रदान देशातील एकूण 1037 पोलीस दल, अग्निशमन दल, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण तसेच सुधारात्मक सेवा दलातील कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शौर्य/सेवा पदके प्रदान






 

नवी दिल्ली, 14: पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला  केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके देऊन सन्मानित करण्यात आले.  महाराष्ट्रातील चिरंजीवी रामछाबिला प्रसादराजेंद्र बालाजीराव डहाळेसतीश राघवीर गोवेकर या पोलिस अधिकाऱ्यांना  विश‍िष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.  यासह राज्यातील 17 पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्याना पोलीस शौर्य पदक तर 39 पोलिसांना गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी पोलीस पदक असे राज्यातील एकूण 59 पोलिसांना पदके प्रदान कण्यात आली.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक आणि पोलीस शौर्य पदक’, जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक  पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते. वर्ष 2024 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण 908 पोलिस अधिकारी/ कर्मचारी यांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 59 पोलिसांचा समावेश आहे.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये  राज्याचे चिरंजीवी रामछाबिला प्रसादअतिरिक्त पोलिस महासंचालकश्री. राजेंद्र बालाजीराव डहाळेसंचालकश्री. सतीश राघवीर गोवेकरसहाय्यक पोलीस आयुक्त यांचा समावेश आहे.  

राज्यातल्या 17 पोलिसांना पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले. पोलीस शौर्य पदकांमध्ये डॉ. कुणाल शंकर सोनावणे - उप-विभागीय पोलीस अधिकारी, दीपक रंभाजी आवटे - पोलीस उपनिरीक्षक, कै. धनाजी तानाजी होनमाने - पोलीस उपनिरीक्षक (मरणोत्तर),  नागेशकुमार बोंड्यालू मदरबोईना - नाईक पोलीस शिपाई, शकील युसुफ शेख - पोलीस शिपाई,  विश्वनाथ सामैय्या पेंदाम - पोलीस शिपाई, विवेक मानकू नरोटे - पोलीस शिपाई,  मोरेश्वर नामदेव पोटावी - पोलीस शिपाई,  कैलाश चुंगा कुलमेथे - पोलीस शिपाई, कोटला बोटू कोरामी - पोलीस शिपाई,  कोरके सन्नी वेलादी - पोलीस शिपाई, महादेव विष्णू वानखेडे - पोलीस शिपाई, अनुज मिलिंद तारे (आयपीएस) -अतिरिक्त पोलीस अधीक्षक,  राहुल नामदेवराव देव्हाडे - पोलीस उपनिरीक्षक,  विजय दादासो सकपाळ - पोलीस उपनिरीक्षक, महेश बोरू मिच्छा - मुख्य शिपाई,  समय्या लिंगय्या आसाम - नाईक पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक राज्यातल्या 39 पोलिसांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये  - दत्तात्रय तुळशीदास शिंदे- उपमहानिरीक्षक, संदीप गजानन दिवाण- उपमहानिरीक्षक, शिवाजी ज्ञानदेव फडतरे- उप-अधीक्षक, संजय मारुती खांदे-अधीक्षक, विनीत जयंत चौधरी-उपअधीक्षक, प्रकाश पांडुरंग गायकवाड-उपनिरीक्षक,  सदानंद जनाबा राणेनिरीक्षकविजय मोहन हातिसकर-पोलीस सहआयुक्त, महेश मोहनराव तराडे-उप अधीक्षक, राजेश रमेश भागवत- निरीक्षक, गजानन कृष्णराव तांदूळकर- उपनिरीक्षक, राजेंद्र तुकाराम पाटील- उपनिरीक्षक, संजय साहो राणे-उपनिरीक्षक, गोविंद दादू शेवाळे-उपनिरीक्षक, मधुकर पोछा नैताम- उपनिरीक्षक, अशोक बापू होनमाने- निरीक्षक, शशिकांत शंकर तटकरे-उपनिरीक्षक,अक्षयवारनाथ जोखुराम शुक्ला-उपनिरीक्षक,शिवाजी गोविंद जुंदरे- उपनिरीक्षक, सुनील लयाप्पा हांडे- सहाय्यक उपनिरीक्षक, प्रकाश मोतीराम देशमुख-उपनिरीक्षक, दत्तू रामनाथ खुळे- सहाय्यक उपनिरीक्षक, रामदास नागेश पालशेतकर- निरीक्षक (पीए), देविदास श्रावण वाघ-सहाय्यक उपनिरीक्षक, प्रकाश शंकर वाघमारे-सहाय्यक उपनिरीक्षक, संजय दयाराम पाटील- सहाय्यक उपनिरीक्षक, मोनिका सॅम्युअल थॉमस- सहाय्यक उपनिरीक्षक,बंडू बाबुराव ठाकरे- मुख्य शिपाई, गणेश मानाजी भामरे- मुख्य शिपाई,अरुण निवृत्ती खैरे- मुख्य शिपाई, दीपक नारायण टिल्लू- मुख्य शिपाई, राजेश तुकारामजी पैदलवार- मुख्य शिपाई, श्रीकृष्ण गंगाराम हिरपूरकर-सहाय्यक कमांडंट, राजू संपत सुर्वे-निरीक्षक,संजीव दत्तात्रेय धुमाळ- निरीक्षक, अनिल उत्तम काळे-सहाय्यक उपनिरीक्षक, मोहन रामचंद्र निखारे- सहाय्यक उपनिरीक्षक, द्वारकादास महादेवराव भांगे-सहाय्यक उपनिरीक्षक, अमितकुमार माताप्रसाद पांडे- उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

सविस्तर यादीचा  तपशील  www.mha.gov.in आणि  https://awards.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

**********

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic  

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 96दिनांक 14.08.2024