Tuesday 11 July 2017

अमरनाथ यात्रेमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 भाविकांचा मृत्यू


नवी दिल्ली, 11 अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. या भाविकांचे मृतदेह हेलीकॉप्टरव्दारे त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती  मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.


सोमवारी रात्री उशीरा अमरनाथ यात्रेसाठी जाणा-या बसवर श्रीनगर येथे दहशतवादी हल्ला झाला.  या हल्ल्यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू  झाला तर 32 भाविक जख्मी झाले आहेत. मृत भाविकांमध्ये 2 महिला भाविक पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील श्रीमती उषा मोहनलाल सोनकर व श्रीमती निर्मला ठाकूर या आहेत. 

No comments:

Post a Comment