Monday 2 December 2019

गेल्या साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी 295 कोटींचा निधी











                 
नवी दिल्ली, 2 :  महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात 295 कोटी 13 लाख2 हजार 500 रुपयांचा निधी वितरीत झाला आहे.

            केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्यावतीने देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षात व चालू आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 221 कोटी 65 लाख 89 हजार 500 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

                              महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांना 295 कोटी 13 लाख   

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी वर्ष 2016-17 ते 2018-19 या मागील तीन आर्थिक वर्षात एकूण 258 कोटी 3 लाख 47 हजार 500 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (21 नोव्हेंबर 2019) 37 कोटी  9 लाख 55 हजारांचा  निधी वितरीत करण्यात आला आहे.

वर्ष 2016-17 ते 2018-19 या मागील तीन आर्थिक्‍ वर्षात देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांसाठी एकूण 1 हजार 10 कोटी 42 लाख  8  हजार 400 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (21 नोव्हेंबर 2019) 211 कोटी 23 लाख 81  हजारांचा  निधी वितरीत करण्यात आला आहे.
केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही  माहिती दिली.

    महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २५९ /  दिनांक 2/12/2019     



No comments:

Post a Comment