Tuesday, 22 August 2023

आजपासून 2410 रुपये प्रति क्विंटल दराने नाफेड व एनसीसीएफकडून कांदा खरेदी सुरू : कृषी मंत्री धनंजय मुंडे

 



राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा

 

नवी दिल्ली, दि. 22: केंद्र सरकार भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ मर्यादित (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ मर्यादित  (एनसीसीएफ) मार्फत राज्यातील 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटल या दराने आजपासूनच खरेदी सुरू झाली, असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना दिली.

 

केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री गोयल यांच्या शासकीय निवासस्थानी कृषी मंत्री श्री मुंडे यांनी भेट घेतली. यावेळी आमदार अतुल बेनके हे ही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधतांना श्री मुंडे म्हणाले, राज्यातील अहमदनगर, नाशिक, लासलगाव आदी केंद्रांवरून हा कांदा खरेदी करण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास दोन लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक कांदा देखील खरेदी केला जाईल. या खरेदीची सुरुवात आज  12:00 वाजल्यापासूनच सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावल्यानंतर कांद्याचे बाजारभाव कमी होतील आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल, ते होऊ नये यासाठी कृषीमंत्री श्री मुंडे  यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री गोयल यांची भेट घेतली. याबैठकीत झालेल्या चर्चेनुसार नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत राज्यातील 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटल  दराने आज 12 वाजल्यापासून खरेदी केला जाईल असे ठरले असल्याचे श्री मुंडे यांनी सांगितले. विषयाची संवेदनश‍ीलता बघता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही केंद्रीय मंत्री श्री गोयल यांच्याशी दुरध्वनीवरून संवाद साधला असल्याची माहिती त्यांनी यांवेळी दिली.

प्रति क्विंटल 2410 रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातील.  शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घ्यावे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही श्री मुंडे यांनी यावेळी दिली. जाहीर केलेला दर समाधानकारक असून शेतकऱ्यांनी नाफेड आणि एनसीसीएफला कांदा विक्री करावी, अशी विंनतीही शेतकऱ्यांना श्री मुंडे यांनी यावेळी माध्यमांच्या माध्यमातून केली.

 

 

केंद्र सरकारने निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी राज्य शासनाकडून करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगतिले. मात्र दरम्यानच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, या दृष्टीने तात्काळ खरेदीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे सांगुन त्यांनी केंद्र सरकारचे धन्यवाद मानले.

Monday, 21 August 2023

केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाला 25 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी राज्यांनाही होईल लाभ


नवी दिल्ली, 21 : भारतातील पशु आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी  महामारी निधी अंतर्गत, भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाला 25 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याचा लाभ राज्यांनाही होईल.

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने, ‘महामारी सज्जता आणि प्रतिसाद अंतर्गत भारतातील प्राण्यांची आरोग्य सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी’ जी-20 महामारी निधीअंतर्गत एक प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर करतमंत्रालयाला 25 दशलक्ष डॉलर्स निधी मंजूर करण्यात आला आहे.

कोविड-19 महामारीमुळे जगभरातील मानवी जीवनआर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेवर झालेले विपरीत परिणाम भरुन काढण्यासाठी अंतरराष्ट्रीय आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करणे आणि भविष्यात महामारीच्या प्रतिबंधसज्जतेसाठी तसेच अशा आजारांना प्रतिसाद देण्यासाठी जागतिक स्तरावर समन्वयक कृती करण्याची गरज आहे.

गेल्या पाच दशकात जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेलेआंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचा विषय ठरलेले सहापैकी पाच आरोग्यविषयक आपत्कालीन आजार प्राणिजन्य आजार होते. परिणामीकोणत्याही साथीच्या आजाराची सज्जता आणि प्रतिसाद उत्तम असावायासाठी एक आरोग्य दृष्टिकोन आवश्यक असून त्यात प्राणी आरोग्य सुरक्षेवर अधिक भर देण्यात आलेला आहे.

इंडोनेशियाच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत स्थापन झालेल्या, ‘महामारी निधी वित्तविषयक महत्वाची गुंतवणूक’ अंतर्गत राष्ट्रीयप्रादेशिक आणि जागतिक पातळीवर महामारी प्रतिबंधनसज्जता आणि प्रतिसाद अधिक मजबूत केला जात असून त्यात कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांवर अधिक भर दिला जात आहे.

महामारी निधीलासुमारे 350 एक्स्प्रेशन्स ऑफ इंटरेस्ट (EoI) आणि 180 पूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आले. यातंर्गत एकूण 2.5 अब्ज डॉलर्स निधी इतके एकूण अनुदानाची  मागणी करण्यात आली होती. महामारी निधी नियामक मंडळानेपहिल्या फेरीत 20 जुलै 2023 रोजी, 19 अनुदाने मंजूर केली. सहा प्रदेशातील 37 देशांमध्येभविष्यात महामारी रोगांबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी हा निधी दिला गेला आहे.

महामारी निधी’, देशात महामारीचे प्रतिबंधात्मक उपायसर्तकता आणि प्रतिसाद याविषयी  जागृकता निर्माण करण्यासाठी समर्पित पैशांचा स्त्रोत तर निर्माण करेलच. या क्षेत्रात अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे,  विविध भागीदारांसोबत अधिक चांगला समन्वय आणि यासाठीचा प्रचार करणारे व्यासपीठ देखील उपलब्ध केले जाईल. या प्रकल्पाअंतर्गतअसुरक्षितदुर्बल लोकांचे आरोग्यपोषण, सुरक्षा आणि उपजीविका धोक्यात येईलअशा संसर्गजन्य आजारांच्या प्राण्यांपासून (पाळीव आणि वन्यजीव) रोगजनकांचा मानवी लोकसंख्येमध्ये प्रसार होण्याचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

हा प्रकल्पप्रमुख अंमलबजावणी यंत्रणा म्हणून आशियाई विकास बँकेद्वारे जागतिक बँक आणि अन्न तसेच कृषी संघटनेच्या सहकार्यातून राबवला जाईल.

00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

मपकेंनदि/वृ.क्र.157दि.21.08.2023


 

महाराष्ट्र उद्योग पुरस्कार उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी और उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान



 

नई दिल्ली 21 : महाराष्ट्र  संत, महात्माओं, विचारकों, स्वातंत्र्य सैनिकों  की भुमी है. देश को स्वतंत्रता मिलने के पश्चात महाराष्ट्र राज्य की निर्मित 1960 मे हुई तब से महाराष्ट्र का सर्वसमावेशी विकास हो इस दिशा मे त्तकाल‍िन नेताओं ने प्रयास किया. इसे और आगे आधुनिक महाराष्ट्र बनाने का प्रयास निरतंर सरकारों ने  जारी रखा. इसलियें आज महाराष्ट्र देश खेती, सहकार, शिक्षा, उद्योग ऐसी भी क्षेत्र मे अग्रणी स्थानपर है.

देश तथा महाराष्ट्र के लिए कियें गये अतुलनीय योगदान के लिए राज्य सरकार हरवर्ष महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कर उचित सम्मान करती है. इसी के धर्तीपर इस वर्ष से राज्य सरकार ने महाराष्ट्र उद्योग पुरस्कार देने की घोषणा की. प्रथम उद्योगरत्न पुरस्कार वरीष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा को उनके निवास स्थानपर शनिवार को प्रदान किया गया.

इसके साथ उद्योगमित्रउद्योगिनीमराठी उद्यमी पुरस्कार की श्रेणी भी रखी गई है.  इसमें  सिरम इंस्टीट्यूट के अदार पुनावाला को उद्योगमित्र पुरस्कारकिर्लोस्कर समूह की गौरी किर्लोस्कर को उद्योगिनी पुरस्कारविलास शिंदे को सर्वश्रेष्ठ मराठी उद्यमी पुरस्कार रविवार को प्रदान किया गया.

यह पुरस्कार समारोह मुंबई के जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर यहा आयोजित किया गया. इस अवसर पर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेन्द्र फड़नवीसउपमुख्यमंत्री अजीत पवारउद्योग मंत्री उदय सामंतमुख्य सचिव मनोज सौनिकउद्योग विभाग के प्रधान सचिव हर्षदीप कांबले आदि उपस्थित थे।

उद्योगरत्नपुरस्कार का प्रारूप 25 लाख रुपयेएक पदक और एक प्रमाण पत्र है। 'उद्योगमित्रपुरस्कार का प्रारूप 15 लाख रुपयेसम्मान चिन्ह और प्रमाण पत्र, 'उद्योगिनीपुरस्कार का प्रारूप 5 लाख रुपयेसम्मान चिन्ह और प्रमाण पत्र और 'सर्वश्रेष्ठ मराठी उद्यमीपुरस्कार का प्रारूप 5 लाख रुपयेसम्मान चिन्ह और प्रमाण पत्र है।

                                           रतन टाटा मनुष्यों मे देवपुरुष  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  

हममें से किसी ने भी भगवान को नहीं देखा है। लेकिनभगवान चराचर में हैं. भगवान हमेशा जरूरतमंदों की मदद के लिए आते हैं। इस वर्ष के उद्योगरत्न पुरस्कार के लिए हमने ऐसे ही एक ईश्वरपुरुष को चुना है।  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस अवसर पर कहा कि टाटा अटूट विश्वासगुणवत्ता का आश्वासन और महान सामाजिक चेतना का प्रतीक है।

मुंबई देश की आर्थिक राजधानी है. महाराष्ट्र राज्य देश की औद्योगिक प्रगति का ग्रोथ इंजन है। इस ग्रोथ इंजन के पीछे सबसे बड़ी ताकत उद्योग क्षेत्र है। उन्होंने कहाइसीलिए सरकार ने यह उद्योग पुरस्कार देकर राज्य के उद्योग जगत को सम्मानित करने का निर्णय लिया है. उद्योग रत्न पुरस्कार के साथ-साथ उन्होंने बताया कि 'उद्योग मित्र', 'उद्योगिनीऔर उत्कृष्ट मराठी उद्यमी के चार सत्कारमुर्ती के बीच बड़ी एक साम्यता है वह है विश्वास है।

मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहाउद्योगपतियों की कई पीढ़ियों ने हमारे राज्य का निर्माण किया। आजादी के बाद से इस देश में उद्योगों का योगदान रहा है। आज देश एवं प्रदेश में बड़े पैमाने पर सर्विस सेक्टरआईटी सेक्टर का विकास हुआ है। औद्योगिक क्षेत्र ने अब तक अरबों हाथों को रोजगार दिया है। हम राज्य में कृषि आधारित उद्योगों को भी बढ़ावा देना चाहते हैं।

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना में 5 ट्रिलियन डॉलर की अर्थव्यवस्था बनानी है, इसमें महाराष्ट्र   1 ट्रिलियन डॉलर का योगदान देना चाहता है। दावोस में विश्व आर्थिक मंच की बैठक में हमने 1 लाख 37 हजार करोड़ के समझौतों पर हस्ताक्षर किये. 85 प्रतिशत अनुबंध क्रियान्वित हो चुके हैं। आज महाराष्ट्र विदेशी निवेश के मामले में देश में शीर्ष स्थान पर पहुंच गया हैऐसा मुख्यमंत्री श्री शिंदे  ने कहा।

 

महाराष्ट्र में सर्वश्रेष्ठ मानव संसाधन - उपमुख्यमंत्री देवेन्द्र फड़णवीस

टाटा ट्रस्ट ने आधुनिक भारत के विकास में अमूल्य योगदान दिया है। हमें गर्व है कि दुनिया का पांचवां सबसे बड़ा टाटा समूह महाराष्ट्र में स्थित है। उपमुख्यमंत्री देवेन्द्र फड़णवीस ने कहा कि प्रत्यक्ष निवेश में महाराष्ट्र नंबर वन है और सबसे अच्छा मानव संसाधन महाराष्ट्र में है।

श्री फड़णवीस ने कहादेश की स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र में है. सबसे ज्यादा स्टार्टअप महाराष्ट्र में हैं. इस्पात उद्योग में निवेश बढ़ रहा हैगढ़चिरौली जिला भविष्य की 'स्टील सिटीके रूप में उभर रहा है। उन्होंने कहा कि सरकार एक ट्रिलियन इकोनॉमी की दिशा में आगे बढ़ते हुए सभी विभागों के साथ आगे बढ़ रही है.

टाटा ट्रस्ट सेवाभावी संस्था - उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य सरकार उद्योग के क्षेत्र में महाराष्ट्र का नाम आगे बढ़ाने के लिए काम कर रही है। टाटा ट्रस्ट एक धर्मार्थ संगठन है। उपमुख्यमंत्री अजित पवार ने कहा कि राज्य के इतिहास में उद्योग क्षेत्र का पहला पुरस्कार रतन टाटा को दिया गया है. उप मुख्यमंत्री श्री पवार ने सभी पुरस्कार विजेताओं को बधाई देते हुए कहा कि नई पीढ़ी ने अपने-अपने क्षेत्र में उल्लेखनीय कार्य कर शानदार काम किया है।

प्रास्ताविक  में उद्योग मंत्री उदय सामंत ने पुरस्कार शुरू करने के पीछे की भूमिका के बारे में बताया. उन्होंने उद्योग मित्र एवं रोजगार मित्र नवीन परियोजनाओं के साथ-साथ उद्योग मित्र वैन के बारे में भी जानकारी दी।

इस अवसर पर अपनी संवेदना व्यक्त करते हुए टाटा ट्रस्ट के चेयरमैन चन्द्रशेखरन ने कहा कि उद्यमियों को पुरस्कृत करना राज्य सरकार की बेहद सराहनीय पहल है. महाराष्ट्र देश में उद्योग जगत में अग्रणी राज्य है। साथ ही इसे शिक्षास्वास्थ्य और उद्योग के मामले में दूरदर्शी राज्य के रूप में भी जाना जाता है।

श्री पुनावाला ने कहासिरम इंस्टीट्यूट देश कीमहाराष्ट्र की संस्था है। महाराष्ट्र ने कोविड काल में 90 प्रतिशत वैक्सीन उपलब्ध करायी। महाराष्ट्र की कार्य संस्कृति अलग हैइसलिए हम महाराष्ट्र में उद्योग को प्राथमिकता देते रहेंगे।उन्होंने कहा कि यह पुरस्कार राज्यदेश के साथ-साथ सीरम संस्थान के श्रमिकों और कर्मचारियों का यह सम्मान है।

गौरी किर्लोस्कर ने उद्योग में महिलाओं के लिए समान अवसर पैदा करने के लिए राज्य सरकार को धन्यवाद दिया। उन्होंने उद्योग के क्षेत्र में अपने दादा और पिता के योगदान का जिक्र करते हुए यह भी कहा कि वह भारत की रचनात्मक शक्ति में विश्वास करती हैं.

विलास शिंदे ने कहामैं एक किसान हूं और यह कहना होगा कि जब से सरकार ने मराठी उद्यमी पुरस्कार दिया हैतब से उद्योग का दर्जा पाने की दिशा में काम शुरू हो गया है। उन्होंने विश्वास जताया कि किसान मिलकर काम करें तो कृषि क्षेत्र में बदलाव जरूर आ सकता है।

इस अवसर पर मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम के अंतर्गत सफल उद्यमियों की सफलता की कहानियों की पुस्तक का विमोचन गणमान्य व्यक्तियों द्वारा किया गया।

0000000000

अंजु निमसरकर/21.08.2023



 

Friday, 18 August 2023

राजधानीत सद्भावना दिन साजरा





 

नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग  यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. यावेळी श्री रुपिंदर सिंग यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. 

यावेळी सदनातील अधिकारी- कर्मचा-यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली .

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा

महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती)अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. श्रीमती अरोरा यांनी यावेळी स्व. राजीव गांधी यांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. 

000000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा : http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.156 / 18.08.2023



 

Thursday, 17 August 2023

मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी जलशक्ती मंत्रालयाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर



नवी‍ दिल्ली, 17: देशभरातील मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांमधील मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांकडून जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने इंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

निवडलेल्या उमेदवारांना विभागाच्या मीडिया आणि सोशल मीडिया कामांमध्ये सहभागी होण्याची संधी देणारा हा अल्प-कालीन इंटर्नशिप कार्यक्रम असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी, मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारिता या विषयातील बीए / एमए अभ्यासक्रमांमध्ये किंवा एमबीए (मार्केटिंग) (मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारितेत पदवी घेतली आहे) चे शिक्षण घेत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठातून उपरोक्त अभ्यासक्रमांमध्ये त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे ते मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद अटींच्या अधीन पात्र आहेत. इंटर्नशिपचा कालावधी तीन ते सहा महिन्यांचा असेल.

निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 10,000/- रुपये मानधन आणि इंटर्नशिपचे प्रमाणपत्र दिले जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

इंटर्नशिपसाठी अर्ज करू इच्छिणारे फॉर्म डाउनलोड करू शकतात आणि इतर तपशील पुढील लिंकवर पाहू शकतात: https://jalshakti-dowr.gov.in/document/notice-for-internship-of- mass-communication-last-date-15-sep-2023/


 

राज्यातील मुदखेड-मेडचल-मेहबुबनगर-ढोण रेल्वेमार्गाचा मार्ग मोकळा एकूण 2339 किमी लांबीच्या, सुमारे 32,500 कोटी रुपये किमतीच्या सात बहु-मार्ग (मल्टीट्रॅकिंग) प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजूरी



 

 नवी दिल्ली, 17 : भारतीय रेल्वेच्या सेवांचा विकास आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रकल्पांना मंजुरी दिली  असून,  यात राज्यातील मुदखेड-मेडचल-मेहबुबनगर-ढोण या मार्गाचा समावेश आहे. एकूण  32,500 कोटी रुपयांच्या  सात रेल्वे प्रकल्पांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने बुधवारी मंजुरी दिली. या प्रकल्पांमुळे रेल्वेची मालवाहतूक वाढणार असून सुमारे कोटी लोकांना रोजगार मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

भारतीय रेल्वेच्या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांसाठी 32,500 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. हे प्रकल्प पूर्णपणे अभियांत्रिकीखरेदी आणि बांधकाम (EPC) मोडवर बांधले जातील तसेच या प्रकल्पांद्वारे भारतीय रेल्वेच्या विद्यमान नेटवर्कमध्ये 2,339 किलोमीटरची वाढ होणार तसेच राज्यांतील लोकांना यामुळे 7.06 कोटी मनुष्यदिवसांचा रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

 

                        मुदखेड-मेडचल-महबूबनगर-ढोणे प्रकल्पाविषयी

मुदखेड-ढोणे दुहेरीकरण प्रकल्प (417.88 किमी) अंदाजे 4,686.09 कोटी रुपये खर्चाचा असणार आहे. या निर्णयामुळे रेल्वे सेवा सुरळीत होईल आणि गर्दी कमी करून रेल्वेच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळू शकेल.

प्रस्तावित प्रकल्पामुळे विभागाची विद्यमान लाईन क्षमता वाढेल आणि वक्तशीरपणा तसेच वॅगन टर्नअराउंड वेळेत सुधारणा होईल. मुदखेड-मेडचल-महबूबनगर-ढोण विभागाचे (417.88 किमी) दुहेरीकरण केल्याने बल्हारशाह-काझीपेठ-सिकंदराबाद आणि काझीपेठ-विजयवाडा दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होईल.

 

                                            या राज्यातील 35 जिल्ह्यांचा समावेश

या सात नव्या रेल्वेच्या प्रकल्पांमध्ये उत्तर प्रदेशबिहारतेलंगणाआंध्र प्रदेशमहाराष्ट्रगुजरातओदिशाझारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील 35 जिल्ह्यांचा या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. यामुळे रेल्वेचे जाळे हजार 339 किलो मीटरने वाढणार आहे.  अन्नधान्य, खते, कोळसा, सिमेंट, राख, लोखंड आणि तयार पोलाद, क्लिंकर, कच्चे तेल, चुनखडी, खाद्यतेल इत्यादी विविध मालाच्या वाहतुकीसाठी हे आवश्यक मार्ग आहेत. क्षमतावाढीच्या कामांमुळे 200 एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) क्षमतेची अतिरिक्त मालवाहतूक होईल. रेल्वे हे पर्यावरणस्नेही आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीचे साधन असल्याने हवामाना संबंधित उद्दिष्टे साध्य करणे आणि देशाच्या मालवाहतूक खर्चात कपात करणे या दोन्हींसाठी मदत होईल.

 

नऊ राज्यांतील रेल्वेमार्गांच्या प्रकल्पांमध्ये गोरखपूर-कॅन्ट-वाल्मिकी नगर – मार्गिकेचे दुहेरीकरण, सोन नगर-आंदल मल्टी ट्रॅकिंग प्रकल्प – मल्टी ट्रॅकिंग, नेरगुंडी-बरंग आणि खुर्दा रोड-विजियानगरम – तिसरी मार्गिका, मुदखेड-मेडचाळ आणि महबूबनगर-ढोणे – विद्यमान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, गुंटूर-बिबीनगर – विद्यमान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, चोपण-चुनार – विद्यमान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व  समखियाली-गांधीधाम समावेश असणार.

Monday, 14 August 2023

76 वा स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा








नवी दिल्ली, 15 :   76  वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते  ध्वजारोहण झाले.

         महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त  तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी समूह राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण झाले. यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलनही झाले.

 या कार्यक्रमास महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त  डॉ. राजेश अडपावार,  श्रीमती स्मिता शेलार, निवासी अभियंता जे.डी. गंगावार, उप अभियंता (विद्युत) आशुतोष दिवेदी, महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भागवंती मेश्राम,  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दोन्ही सदनात निवासास असणारे अतिथी तसेच दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

 दरम्यान, राजधानीतील लाल किल्ल्यावर आयोजित मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.  यावेळी त्यांनी देशाला संबोधित केले. देशभरातून विविध क्षेत्रातील 1800 लोक या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाले.

 स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

      

00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर, माहिती अधिकारी/वृ.क्र.153, दि.15.08.2023


 

महाराष्ट्रातील 17 तुरूंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर


 

नवी दिल्ली, 14 : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवांसाठी  विविध पदके आज जाहीर करण्यात आली आहेत. तुरूंग कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुधारात्मक सेवांसाठी देखील पदके जाहीर झाली  आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण  17 तुरूंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील तुरूंग कर्मचााऱ्यांची यादी

 

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक

1.      श्री सुनील निवृत्ती धमाल अतिरिक्त अधीक्षक वर्ग 1

2.      श्री प्रकाश बाबुराव उकरंडेजेलर ग्रुप 1

3.      श्री तात्यासाहेब सदाशिव निंबाळकरजेलर ग्रुप 1

4.    श्री आनंद शंकर हिरवेसुभेदार

5.     श्री गणेश पांडुरंग घोडकेहवालदार

 

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक

1.      श्री अनिल हणमंत खामकरअधीक्षक वर्ग 1

2.      श्री वामन तुकाराम निमजेजेलर गट 1

3.      श्री विजय ज्ञानेश्वर कांबळेजेलर ग्रुप 1

4.    श्री तानाजी कृष्ण धोत्रेजेलर ग्रुप 2

5.     श्री किशोरीलाल सुकराम रहांगडालेसुभेदार

6.      श्री विजय लाडकू पाटीलसुभेदार

7.     श्री प्रकाश महादेव सातपुतेसुभेदार

8.     श्री चंद्रकांत नारायण बोसोडेसुभेदार

9.      श्री.बाबासाहेब हनुमंत चोरगेहवालदार

10.  श्री दत्तात्रय किसन भोसलेहवालदार

11.  श्री अशोक कुंडलिक आडाळेशिपाई

12.  श्री सुधाकर रामकृष्ण माळवेशिपाई

--